शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

कावडधारी शिवभक्तांचे अकोल्यात आगमण; राजराजेश्वराला जलाभिषेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 15:37 IST

पूर्णा नदीचे पाणी आणण्यासाठी गेलेल्या कावडधारी शिवभक्तांचे सोमवारी सकाळी अकोल्यात आगमण झाले.

अकोला : संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेला अकोल्याच्या कावड महोत्सवाला सुरुवात झाली असून, रविवारी गांधीग्राम येथील पूर्णा नदीचे पाणी आणण्यासाठी गेलेल्या कावडधारी शिवभक्तांचे सोमवारी सकाळी अकोल्यात आगमण झाले. पहिली कावड राजराजेश्वर मंदीराकडे रवाना झाली आहे. हजारो शिवभक्त दिवसभर कावडमधून आणलेल्या जलाचा अभिषेक राजराजेश्वराला करणार आहेत.शहराच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेला जोपासणाऱ्या पालखी व कावड उत्सवाला यंदा ७५ वर्षे पूर्ण होत आहेत.या अमृत महोत्सवात सहभागी होण्यासाठी शिवभक्तांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गांधीग्राम येथील पूर्णा नदीचे जल घेऊन कावडधारी सोमवारी सकाळी शहरात दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी अकोलेकर सज्ज झाले असून, ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. गांधी चौकात कावड व पालखींचे स्वागत करण्यात येत आहे.

जुने शहरातून सर्वाधिक कावडजुने शहरात कावड मंडळांची मोठी संख्या आहे. यंदा सर्वाधिक भरणे असलेली डाबकी रोडवासी मित्र मंडळ, हरिहरपेठमधून निघणारी श्री राम सेना मंडळाची कावड, मानाचे स्थान असणारी हरिहर शिवभक्त मंडळ, जय भवानी शिवभक्त मंडळ तसेच सर्वाधिक साडेचार हजार सदस्य संख्या असणाºया जय बाभळेश्वर शिवभक्त मंडळाच्यावतीने १०१ भरण्यांची कावड तसेच विठ्ठलाच्या दशर्नाचा देखावा अकोलेकरांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरली आहे.

पावसातही शिवभक्तांमध्ये उत्साहखांद्यावरून सर्वाधिक संख्येने भरणे आणण्यामध्ये जुने शहरातील काही प्रमुख कावड मंडळांचा समावेश आहे. सोमवारी वरुणराजाने हजेरी लावली. भरपावसातही शिवभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहावयास मिळाले.

टॅग्स :AkolaअकोलाIndian Festivalsभारतीय सण