शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

आंबेडकरांच्या आघाडी प्रस्तावाला ओबीसी जागरची किनार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 14:54 IST

अकोला : सोशल इंजिनिअरींगच्या माध्यमातून राजकारणात ‘अकोला पॅर्टन’ निर्माण करून प्रस्थापित राजकीय पक्षांना पर्याय देणाऱ्या अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी आता पुरोगामी पक्षांसोबत आघाडीची तयारी दर्शविली आहे.

ठळक मुद्देधनगर, ओबीसी, मुस्लिम अशा वंचित जातीतील उमेदवारांना एकत्र घेऊन आगामी लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी आंबेडकरांनी केली आहे. आघाडीच्या या प्रस्तावात व्यक्त केलेल्या अपेक्षांना भारिप-बमसंने राबवलेल्या ओबीसी जागर उपक्रमांची किनार आहे. त्यामुळे परंपरागत एक गठठा मतांसोबतच ओबीसींची मोट बांधण्याच्या अ‍ॅड.आंबेडकरांचा प्रयत्न अधोरेखीत झाला आहे.

- राजेश शेगोकार

अकोला : सोशल इंजिनिअरींगच्या माध्यमातून राजकारणात ‘अकोला पॅर्टन’ निर्माण करून प्रस्थापित राजकीय पक्षांना पर्याय देणाऱ्या अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी आता पुरोगामी पक्षांसोबत आघाडीची तयारी दर्शविली आहे. धनगर, ओबीसी, मुस्लिम अशा वंचित जातीतील उमेदवारांना एकत्र घेऊन आगामी लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी आंबेडकरांनी केली आहे. या उमेदवारांना न्याय देण्यासाठी जो पुरोगामी पक्ष आम्हाला दहा जागा देईल, त्यांच्याशी आघाडी करण्याचा प्रस्ताव त्यांनी एका पत्रकार परिषदेच्या निमित्ताने पुरोगामी पक्षांना दिला आहे. आघाडीच्या या प्रस्तावात व्यक्त केलेल्या अपेक्षांना भारिप-बमसंने राबवलेल्या ओबीसी जागर उपक्रमांची किनार आहे. त्यामुळे परंपरागत एक गठठा मतांसोबतच ओबीसींची मोट बांधण्याच्या अ‍ॅड.आंबेडकरांचा प्रयत्न अधोरेखीत झाला आहे.अकोला लोकसभा मतदारसंघात अ‍ॅड.प्रकाश आंबेडकरांनी ओबीसीच्या मतांची मोट बांधत प्रस्थापित भाजपासह कॉँग्रेसलाही शह दिला. जिल्हा परिषदेसारखे मिनी मंत्रालय दोन दशकांपासून याच बळावर ताब्यात ठेवले. ओबीसीमधील अनेकांना आमदार केले. भारिप-बमसंने निर्माण केलेली हीच ताकद मात्र अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांना लोकसभेत पाठविण्यास मात्र अपुरी ठरली. या ताकदीला आघाडीच्या मतांची शिदोरी जेव्हा-जेंव्हा मिळाली तेंव्हा-तेव्हा अ‍ॅड.आंबेडकरांचा विजय झाला. या पृष्ठभूमीवर अ‍ॅड.आंबेडकरांनी आघाडी बाबत केलेले सुतोवाच आगामी निवडणुकीची रणनिती स्पष्ट करणारे ठरले आहे.अ‍ॅड.आंबेडकरांनी अकोल्यासह पश्चिम वºहाडात ओबीसी जागर हा उपक्रम गेल्या वर्षभरापासून हाती घेतला होता. गाव व तालुका पातळीवर ओबीसींच्या बैठका घेत त्यांनी मोर्चेबांधणी केली व अकोल्यात जानेवारी महिन्यात ओबीसींचा मेळावा घेऊन ओबीसींची एकजुट करण्याचा प्रयत्न केला. या मेळाव्यानंतर त्यांनी पंढरपुरात धनगर मेळावा घेऊन मोठा वर्ग आपल्या पक्षासोबत कसा जुळेल याचा प्रयत्न केला व आता भटक्या विमुक्तांसाठी वंचीतांचा मेळावा घेऊन ओबीसी जागर उपक्रमांला आणखी बळ मिळेल असा प्रयत्न केला आहे.अकोला पॅर्टन मध्ये ओबीसींना उमेदवारी देऊन त्यांच्या पाठीशी आपली ‘व्होट बँक’ त्यांनी उभी करून विजय मिळविला आहे. हा धागा पकडून त्यांनी आता लोकसभेसाठी दहा जागांचा सारीपाट मांडला आहे. धनगर, माळी, ओबीसी आणि मुस्लिम समाजाकरिता प्रत्येकी दोन जागा भारिप-बमसंच्या वतिने देण्याचे त्यांचे नियोजन आहे. या समाजाची संख्या मोठी असल्याने त्याचा फायदा आपोआपच अकोला पॅर्टनला होईल असाही त्यांचा होरा असून शकतो. अ‍ॅड.आंबेडकरांनी जाहिरपणे दिलेल्या या प्रस्तावाबाबत प्रामुख्याने काँग्रेसलाच विचार करावा लागणार असल्याने आता चेंडू काँग्रेसच्या कोर्टात आहे. अकोला लोकसभा मतदारसंघातील विजयाला भाजपाने काँग्र्रेसमुक्त केले आहे त्यामुळे अकोल्यासह इतर दहा मतदारसंघात काँग्रेस भारिप-बमसं सोबत तडजोड करेल का हा प्रश्नच आहे. विशेष म्हणजे अ‍ॅड.आंबेडकर आघाडीसाठी इच्छुक नाहीत असा आरोप काँग्रेसच्या गोटातून नेहमीच होतो त्यामुळे आता त्यांनी काँग्रेसचे नाव जरी घेतले नसले तरी आघाडीचा दिलेला प्रस्ताव हा काँग्रेससाठी खुला आहेच .त्यातच अ‍ॅड.आंबेकडरांनी थेट समाजाची नावे घेऊन प्रतिनिधीत्व मागीतल्याने उद्या तडजोडीमध्ये एखाद्या समाजाला आघाडी करतांना डावलल्या गेले तर त्या समाजाचा रोष होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे अ‍ॅड.आंबेडकरांच्या गुगलीवर काँग्रेससह इतर पुरोगामी पक्ष कसे खेळतात याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :AkolaअकोलाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघcongressकाँग्रेस