शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

आंबेडकरांच्या आघाडी प्रस्तावाला ओबीसी जागरची किनार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 14:54 IST

अकोला : सोशल इंजिनिअरींगच्या माध्यमातून राजकारणात ‘अकोला पॅर्टन’ निर्माण करून प्रस्थापित राजकीय पक्षांना पर्याय देणाऱ्या अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी आता पुरोगामी पक्षांसोबत आघाडीची तयारी दर्शविली आहे.

ठळक मुद्देधनगर, ओबीसी, मुस्लिम अशा वंचित जातीतील उमेदवारांना एकत्र घेऊन आगामी लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी आंबेडकरांनी केली आहे. आघाडीच्या या प्रस्तावात व्यक्त केलेल्या अपेक्षांना भारिप-बमसंने राबवलेल्या ओबीसी जागर उपक्रमांची किनार आहे. त्यामुळे परंपरागत एक गठठा मतांसोबतच ओबीसींची मोट बांधण्याच्या अ‍ॅड.आंबेडकरांचा प्रयत्न अधोरेखीत झाला आहे.

- राजेश शेगोकार

अकोला : सोशल इंजिनिअरींगच्या माध्यमातून राजकारणात ‘अकोला पॅर्टन’ निर्माण करून प्रस्थापित राजकीय पक्षांना पर्याय देणाऱ्या अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी आता पुरोगामी पक्षांसोबत आघाडीची तयारी दर्शविली आहे. धनगर, ओबीसी, मुस्लिम अशा वंचित जातीतील उमेदवारांना एकत्र घेऊन आगामी लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी आंबेडकरांनी केली आहे. या उमेदवारांना न्याय देण्यासाठी जो पुरोगामी पक्ष आम्हाला दहा जागा देईल, त्यांच्याशी आघाडी करण्याचा प्रस्ताव त्यांनी एका पत्रकार परिषदेच्या निमित्ताने पुरोगामी पक्षांना दिला आहे. आघाडीच्या या प्रस्तावात व्यक्त केलेल्या अपेक्षांना भारिप-बमसंने राबवलेल्या ओबीसी जागर उपक्रमांची किनार आहे. त्यामुळे परंपरागत एक गठठा मतांसोबतच ओबीसींची मोट बांधण्याच्या अ‍ॅड.आंबेडकरांचा प्रयत्न अधोरेखीत झाला आहे.अकोला लोकसभा मतदारसंघात अ‍ॅड.प्रकाश आंबेडकरांनी ओबीसीच्या मतांची मोट बांधत प्रस्थापित भाजपासह कॉँग्रेसलाही शह दिला. जिल्हा परिषदेसारखे मिनी मंत्रालय दोन दशकांपासून याच बळावर ताब्यात ठेवले. ओबीसीमधील अनेकांना आमदार केले. भारिप-बमसंने निर्माण केलेली हीच ताकद मात्र अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांना लोकसभेत पाठविण्यास मात्र अपुरी ठरली. या ताकदीला आघाडीच्या मतांची शिदोरी जेव्हा-जेंव्हा मिळाली तेंव्हा-तेव्हा अ‍ॅड.आंबेडकरांचा विजय झाला. या पृष्ठभूमीवर अ‍ॅड.आंबेडकरांनी आघाडी बाबत केलेले सुतोवाच आगामी निवडणुकीची रणनिती स्पष्ट करणारे ठरले आहे.अ‍ॅड.आंबेडकरांनी अकोल्यासह पश्चिम वºहाडात ओबीसी जागर हा उपक्रम गेल्या वर्षभरापासून हाती घेतला होता. गाव व तालुका पातळीवर ओबीसींच्या बैठका घेत त्यांनी मोर्चेबांधणी केली व अकोल्यात जानेवारी महिन्यात ओबीसींचा मेळावा घेऊन ओबीसींची एकजुट करण्याचा प्रयत्न केला. या मेळाव्यानंतर त्यांनी पंढरपुरात धनगर मेळावा घेऊन मोठा वर्ग आपल्या पक्षासोबत कसा जुळेल याचा प्रयत्न केला व आता भटक्या विमुक्तांसाठी वंचीतांचा मेळावा घेऊन ओबीसी जागर उपक्रमांला आणखी बळ मिळेल असा प्रयत्न केला आहे.अकोला पॅर्टन मध्ये ओबीसींना उमेदवारी देऊन त्यांच्या पाठीशी आपली ‘व्होट बँक’ त्यांनी उभी करून विजय मिळविला आहे. हा धागा पकडून त्यांनी आता लोकसभेसाठी दहा जागांचा सारीपाट मांडला आहे. धनगर, माळी, ओबीसी आणि मुस्लिम समाजाकरिता प्रत्येकी दोन जागा भारिप-बमसंच्या वतिने देण्याचे त्यांचे नियोजन आहे. या समाजाची संख्या मोठी असल्याने त्याचा फायदा आपोआपच अकोला पॅर्टनला होईल असाही त्यांचा होरा असून शकतो. अ‍ॅड.आंबेडकरांनी जाहिरपणे दिलेल्या या प्रस्तावाबाबत प्रामुख्याने काँग्रेसलाच विचार करावा लागणार असल्याने आता चेंडू काँग्रेसच्या कोर्टात आहे. अकोला लोकसभा मतदारसंघातील विजयाला भाजपाने काँग्र्रेसमुक्त केले आहे त्यामुळे अकोल्यासह इतर दहा मतदारसंघात काँग्रेस भारिप-बमसं सोबत तडजोड करेल का हा प्रश्नच आहे. विशेष म्हणजे अ‍ॅड.आंबेडकर आघाडीसाठी इच्छुक नाहीत असा आरोप काँग्रेसच्या गोटातून नेहमीच होतो त्यामुळे आता त्यांनी काँग्रेसचे नाव जरी घेतले नसले तरी आघाडीचा दिलेला प्रस्ताव हा काँग्रेससाठी खुला आहेच .त्यातच अ‍ॅड.आंबेकडरांनी थेट समाजाची नावे घेऊन प्रतिनिधीत्व मागीतल्याने उद्या तडजोडीमध्ये एखाद्या समाजाला आघाडी करतांना डावलल्या गेले तर त्या समाजाचा रोष होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे अ‍ॅड.आंबेडकरांच्या गुगलीवर काँग्रेससह इतर पुरोगामी पक्ष कसे खेळतात याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :AkolaअकोलाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघcongressकाँग्रेस