शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

काँग्रेस आघाडीत आंबेडकरांच्या समावेशाचा संभ्रम कायम; कार्यकर्ते गोंंधळात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 12:32 IST

अकोला: भारिप-बमसंचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येत्या लोकसभा निवडणुकीसाठी आपले पत्ते खुले केले आहेत. भारिप-बमसं ‘एमआयएम’सोबतच निवडणूक लढविणार असून, वंचित बहुजन समाजातील १२ समाजांना प्रतिनिधित्व देण्यासाठी त्यांनी उमेदवार निश्चितीचेही पाऊल उचलले आहे.

-  राजेश शेगोकारअकोला: भारिप-बमसंचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येत्या लोकसभा निवडणुकीसाठी आपले पत्ते खुले केले आहेत. भारिप-बमसं ‘एमआयएम’सोबतच निवडणूक लढविणार असून, वंचित बहुजन समाजातील १२ समाजांना प्रतिनिधित्व देण्यासाठी त्यांनी उमेदवार निश्चितीचेही पाऊल उचलले आहे. या पृष्ठभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे आंबेडकरांच्या आघाडीतील समावेशाबाबत प्रचंड आशावादी असल्याची विधाने समोर येत असल्यामुळे इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांचाही गोेंधळ उडत असल्याचे चित्र सध्या राजकीय वर्तुळात आहे.धनगर, ओबीसी, मुस्लीम अशा वंचित जातीतील उमेदवारांना एकत्र घेऊन आगामी लोकसभा निवडणूक लढविणार असून, या उमेदवारांना न्याय देण्यासाठी जो पुरोगामी पक्ष आम्हाला १२ जागा देईल, त्यांच्याशी आघाडी केली जाईल, असा प्रस्ताव अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनीकाँग्रेसला दिला होता. या प्रस्तावावर चर्चा सुरू होण्याआधीच त्यांनी ‘एमआयएम’सोबत मैत्री जाहीर केल्यामुळे आंबेडकरांचा महाआघाडीतील प्रवेशाला अडथळा आला. दरम्यानच्या काळात काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेसने महाआघाडीमध्ये मित्रपक्षांना प्रत्येकी एक जागा देण्याचे ठरविले असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी केवळ ८ मतदारसंघांबाबतच आघाडीचा गुंता असून, त्यापैकी कोणत्या जागा मित्रपक्षांना द्यायच्या, याची चर्चा दोन्ही काँग्रेसमध्ये सुरू आहे. काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेस हे मित्रपक्षांसाठी केवळ आठ जागा सोडू इच्छित असल्याने साहजिकच अ‍ॅड. आंबेडकरांच्या १२ जागांच्या प्रस्तावाला या वाटाघाटीत स्थान नसल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे केवळ अकोल्याच्या जागेसाठी अ‍ॅड. आंबेडकर आघाडीत समाविष्ट होऊन वंचित बहुजन आघाडीला वाऱ्यावर सोडण्याची सुतराम शक्यता नाही. या पृष्ठभूमीवर एकीकडे काँग्रेसने लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार ठरविण्याची प्रक्रिया सुरू केली असून, अकोल्यात तब्बल २० उमेदवारी अर्ज पक्षाकडे प्राप्त झाले आहेत. इच्छुक उमेदवारांनी तयारीही सुरू केली असताना दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये बोलताना अ‍ॅड. आंबेडकर हे आघाडीत सहभागी होतील, चर्चा सकारात्मक सुरू आहे, असे विधान केल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांचा मात्र गोंधळ सुरू झाला आहे. काँग्रेसची अगतिकता कशासाठी?काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीत प्रचंड आशावादी असल्याचे दिसत असले, तरी अ‍ॅड. आंबेडकरांनी मात्र काँग्रेसवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. बुधवारी त्यांनी यवतमाळात काँग्रेसच्या धोरणांवर जोरदार टीका करून एकप्रकारे काँग्रेससोबत आघाडी होणार नसल्याचेच संकेत दिले आहेत, तसेच गेल्या पंधरवड्यात बुलडाणा लोकसभा मतदारसंघासाठी थेट उमेदवारच जाहीर केल्याने आता महाआघाडीचा विषयच संपविला असताना काँग्रेसची त्यांना सोबत घेण्याची अगतिकता कशासाठी, असा प्रश्नही आता काँग्रेसच्याच वर्तुळात उपस्थित होत आहे.

 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरPoliticsराजकारणcongressकाँग्रेस