शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

आंबेडकरांनी दलित, मुस्लिमांमध्ये भीती निर्माण करण्याचे काम केले! - नितीन गडकरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 12:28 IST

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दलित व मुस्लीम समाजात भाजपबद्दल भीती व संभ्रम निर्माण करण्याचे काम केल्याचे टीकास्त्र केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी यांनी सोडले.

अकोला: मागील पाच वर्षांत भाजप सरकारने देशातील सर्वसामान्य जनतेसाठी विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी केली. त्याचा लाभ गोरगरीब कुटुंबांना होत असून, कोणतीही योजना अमूक एका जाती समूहासाठी नसून, ती सर्वांसाठी असल्याचे सिद्ध झाले आहे. नेमकी हीच बाब विरोधकांच्या पचनी पडत नाही. त्यामुळेच अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दलित व मुस्लीम समाजात भाजपबद्दल भीती व संभ्रम निर्माण करण्याचे काम केल्याचे टीकास्त्र केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी यांनी सोडले. वाडेगाव येथे भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार अ‍ॅड. संजय धोत्रे यांच्या जाहीर सभेत नितीन गडकरी यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीसह वंचित बहुजन आघाडीचा खरपूस समाचार घेतला.तत्कालीन काँग्रेस, राष्ट्रवादी सरकारच्या १५ वर्षांच्या कार्यकाळात सिंचन प्रकल्पांवर कोट्यवधींचा खर्च करूनही प्रकल्प अर्धवट होते. प्रकल्पाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांकडून अक्षरश: दहा टक्के दराने कमिशन उकळण्यात आले. २०१४ मध्ये राज्यात सत्तापरिवर्तन होताच भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात सिंचन प्रकल्पाचे काम बंद करण्याचे पातक काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केल्याचा आरोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला. जिल्ह्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांसाठी खा.संजय धोत्रे यांची तळमळ दिसून आली. त्यावेळी त्यांना कोट्यवधींचा निधी दिला. या प्रकल्पांचा फायदा अकोला व बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. राज्यातील शेतकºयांना वीज कनेक्शन, सब स्टेशन, रोहित्रांचा ‘बॅकलॉग’ भरून काढण्याचे काम भाजप-सेना सरकारने केले. केंद्र सरकारने योजनांचा लाभ देताना जातीपातीचे राजकारण केले नाही. ही विरोधकांची पोटदुखी असून, आजही त्यांचा आपसात मेळ नाही. देशाला स्थिर सरकार देण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी मतदारांना आवाहन केले. यावेळी व्यासपीठावर खा.अ‍ॅड.संजय धोत्रे यांच्यासह भाजप-सेनेचे सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNitin Gadkariनितीन गडकरीMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019BJPभाजपाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरakola-pcअकोला