शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

युती जोशात; वंचितच्या भूमिकेवर आघाडीची मदार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 03:56 IST

अकोला जिल्ह्यातील चित्र : युतीत शिवसेनेला अन् आघाडीत राष्ट्रवादीला किती जागा मिळणार?

राजेश शेगोकार अकोला : अकोल्याच्या पाच पैकी चार मतदारसंघात विजय मिळवून भारतीय जनता पक्षाने गेल्या विधानसभा निवडणूकीत नवा विक्रम प्रस्थापित केला. केवळ बाळापूर मतदारसंघात भारिप-बहुजन महासंघाला विजय मिळाला आहे, त्यामुळे येत्या निवडणुकीत भाजपाने ‘शतप्रतिशत भाजप’ हे आव्हान घेऊन केलेल्या मोर्चेबांधणीमध्ये आता शिवसेनेचा दोन तर शिवसंग्रामचा एका मतदारसंघावरचा दावा अडसर ठरण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्येही जागा वाटपावरून दावे-प्रतिदावे रंगले आहेत तर वंचित बहुजन आघाडी यावेळी नव्या दमाने रिंगणात उतरण्याची तयारी करीत असल्याचे चित्र जिल्हाभरात आहे.

लोकसभा निवडणुकीत ‘वंचित’ ने काँग्रेस आघाडीच्या विजयाचे गणित बिघडविल्यामुळे राज्यभरात ‘वंचित’च्या ताकदीची दखल घेत, नव्याने समीकरणांची मांडणी केली जात असली तरी अकोल्यात मात्र हे आव्हान नवे नाही. अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांची राजकीय राजधानी असलेल्या अकोल्यात त्यांनी भारिप-बमसंच्या माध्यमातून केवळ मतांच्या विभाजनाचीच भूमिका पार पाडली नाही, तर थेट आमदार निवडून आणण्यापर्यंत तिसरा पर्याय दिला आहे.

शिवसेनेने दोन मतदारसंघांची मागणी केली आहे. भाजपाचा आमदार नसलेला बाळापूर हा मतदारसंघ सेनेला देणे भाजपाला सहज शक्य आहे; मात्र सेनेला दोन मतदारसंघ हवे आहेत. कोणत्याही विद्यमान आमदाराचे तिकीट कापून सेनेला मतदारसंघ देणे भाजपाला सध्या तरी शक्य दिसत नाही. त्यातही गेल्यावेळी बाळापूर मतदारसंघ भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसंग्रामला देण्याचे ठरले होते; मात्र ऐनवेळी चक्र फिरले अन् भाजपाचाच ‘एबी’ फॉर्म दाखल झाला, त्यामुळे बाळापूरसाठी शिवसंग्रामही आग्रही आहे. या पृष्ठभूमीवर सेना व शिवसंग्राम यांची समजूत कशी काढली जाते, यावरच ‘युती’ साठी कोण माती खाणार, हे ठरणार आहे.

दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसही तयारीला लागली आहे; मात्र या तयारीला नेतृत्वाचे बळ कितपत मिळते, यावरच सारे काही अवलंबून आहे. आतापर्यंत आघाडीत काँग्रेसला अकोट, अकोला पूर्व, बाळापूर हे तीन मतदारसंघ मिळत आले आहेत, यावेळी मात्र काँग्रेसने राष्ट्रवादीला हव्या असलेल्या अकोला पश्चिमवरही दावा केला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीनेही बाळापूर या मतदारसंघात काँग्रेसने सातत्याने दिलेल्या मुस्लीम उमेदवाराचा पराभव होत असल्याचा मुद्दा समोर करीत या मतदारसंघावर दावा केला आहे. या दोन्ही पक्षांच्या दाव्यामुळे आघाडीत जागा वाटपाचा गुुंता होण्याची चिन्हे आहेत. हा गुंता व्यवस्थित सुटला व उमेदवारीची भाकरी फिरविली तरच दोन्ही काँग्रेसला पुन्हा उर्जितावस्था मिळण्याची संधी आहे. गेल्यावेळी भारिप-बमसं म्हणून रिंगणात असलेला पक्ष यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या रूपाने आव्हान देण्यास सज्ज आहे. युती, आघाडी व वंचित अशी तिरंगी लढत अपेक्षित असली तरी उद्या वंचित महाआघाडीमध्ये सहभागी झालीच तर युतीसमोरील आव्हान तगडे ठरण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत पुन्हा जागा वाटप व उमेदवार हा कळीचा मुद्दा ठरेल, एवढे निश्चित.

२०१४मधील निवडणुकीत सर्वांत मोठा विजय :अकोला पश्चिम: गोवर्धन शर्मा (भाजप) । मते : ६६,९३४ फरक ३९,९५३.सर्वांत कमी मताधिक्याने पराभव : अकोला पूर्व : हरिदास भदे (भारिप-बमसं) - २,४४० (विजयी - रणधीर सावरकर, भाजप).एकूण जागा : ०५ । सध्याचे बलाबलभाजप - ०४ , भारिप-बमसं-१

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Akolaअकोला