शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
2
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
3
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
4
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
5
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
6
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
7
डॉ. शाहीनच्या संपर्कात होते ३० ते ४० डॉक्टर, १ हजाराहून अधिक संशयित; तपासात धक्कादायक खुलासा
8
करिश्मा कपूरच्या मुलीची फी दोन महिन्यांपासून थकली; हायकोर्ट म्हणाले, 'आम्हाला इथे ड्रामा नकोय'
9
Tarot Card: आगामी आठवडा आत्मचिंतनाचा, त्यानंतर गरुडभरारीचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
10
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
11
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
12
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
13
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
14
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
15
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
16
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
17
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
18
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
19
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
20
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
Daily Top 2Weekly Top 5

अकोला बाजारपेठेत हरभरा, सोयाबीनचे दर घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 12:57 IST

बाजारगप्पा : भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

- राजरत्न सिरसाट ( अकोला )

अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभऱ्याचे दर मागील पंधरा दिवसांत कमी झाले असून, यामुळे हरभरा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. शुक्रवारी बाजारात ५६ क्विंटल हरभरा विक्रीला आला होता. प्रतिक्विंटल  सरासरी ३९०० रुपये दर हरभऱ्याला मिळाला. आवक कमी असूनही हरभऱ्याला भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

बाजारात सोयाबीनचे दर गेल्या आठवड्यापासून स्थिर असून, ते वाढण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. मागील महिनाभरापूर्वी सोयाबीनचे दर ३३५० रुपयांपर्यंत वाढले होते. या आठवड्यात हे दर सरासरी ३१९० रुपयांपर्यंत खाली आहे. दर वाढतील या आशेने अनेक शेतकऱ्यांनी घरात सोयाबीन साठवून ठेवले आहे. मात्र, दर वाढत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

यावर्षी शासकीय खरेदी केंद्र सुरू  करण्यात विलंब झाला असून, अद्याप पूरक खरेदी केंदे्र सुरू  झाली नाहीत; पण मागील महिन्यात बाजारातील दर प्रतिक्ंिवटल ३३५० रुपयांपर्यंत वाढले होते, त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. शासनाने सोयाबीनचे आधारभूत दर ३३९९ रुपये प्रतिक्ंिवटल जाहीर केलेले आहेत. बाजारात प्रतिक्ंिवटल सरासरी ३३५० रुपये शेतकऱ्यांना मिळत होते, तोपर्यंत चिंता नव्हती. आता दरात घट सुरू  झाली असून, दर वाढतील, या प्रतीक्षेत बाजारातील सोयाबीनची आवकही घटली आहे. शुक्रवारी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २१६५ क्विंटल सोयाबीन विक्रीस आले होते. या आठवड्यात ही सरासरी आवक आहे. मागच्या महिन्यात हीच आवक सरासरी चार हजार क्विंटल. तर मागील आठवड्यात ही आवक घटून सरासरी अठराशे क्विंटलपर्यंत आली होती.

मागील आठवड्याचा विचार केला तर आवकमध्ये तीनशे क्विंटलनी वाढ झाली आहे. सोयाबीनच्या दरात वाढ होईल अशी शक्यता अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वर्तुळात वर्तविली जात होती. शेतकऱ्यांना मात्र अद्यापही शासकीय धोरणात बदल होऊन दर वाढतील, अशी अपेक्षा आहे.

कपाशीची आधारभूत किंमत प्रतिक्विंटल कापसाच्या आखूड, लांब धाग्यानुसार ५१५० ते ५४५० रुपये होती; तथापि, डिसेंबर महिन्यात कापसाचे दर अचानक घटले असून, प्रतिक्विंटल ५०० ते ६०० रुपयांनी कमी झाल्याने कापसानेही शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दरम्यान, तीळ या तेलबिया पिकाच्या दरात या आठवड्यात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उडदाची प्रतिक्विंटल सरासरी ४५०० रुपये, मूग ५१०० रुपये, तूर ४५०० रुपये तर तुरीची आवक ५२१ क्विंटल होती. मक्याची आवक शुक्र वारी ९ क्विंटल होती तर मक्याला सरासरी भाव १८०० रुपये मिळाला. बाजरीची आवक सहा क्विंटल होती. बाजरीला सरासरी भाव अठराशे रुपये मिळाला. तर ज्वारीला सरासरी अठराशे रुपये भाव मिळाला.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी