शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

अकोला-खंडवा ब्रॉडगेज मार्ग राजकीय ट्रॅकवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 10:28 AM

सर्वोच्च न्यायालयात लढाई सुरू असतानाच आता या मुद्याचे राजकीयकरण होत असल्याचे दिसत आहे.

- राजेश शेगोकार लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: अकोला-खंडवा रेल्वे मार्गाचे मीटरगेजमधून ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यासाठी येणाऱ्या अडथळ्यांची शर्यत थांबायला तयार नाही. हा मार्ग मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जात असल्याने या मार्गाला पर्याय शोधावा, असे समोर आल्यावर हा मार्ग बुलडाण्यातून नेण्यासाठी राजकीय आंदोलन उभे राहिले दुसरीकडे या मार्गावरील अकोटपर्यंतचा टप्पा पूर्ण झाल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पर्यायी मार्गाची पाठराखण केल्याने हा मुद्दा आता पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या मार्गासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात लढाई सुरू असतानाच आता या मुद्याचे राजकीयकरण होत असल्याचे दिसत आहे.अकोला ते खंडवा या एकूण १७६ किमी लांबीच्या रेल्वेमार्गाचा ३८ किलोमीटरचा पट्टा हा मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जातो. यापैकी २३ किलोमीटरचा मार्ग हा व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातून जात असल्याने पर्यावरणप्रेमींचा या मार्गाला विरोध होत आहे. मेळघाटमधून जाणारा प्रस्तावित मार्ग हा पर्यावरण व सामाजिक जीवनावर प्रतिकूल परिणाम असून, त्याऐवजी पर्यायी मार्ग व्यापक लोकहिताचा असल्याचा रेटा राज्य शासनाकडे सुरू असून, न्यायालयातही याचिका दाखल आहेत. याच सर्वोच्च न्यायालयाच्या मध्यवर्ती समितीकडे सध्या प्रकरण सोपविलेले आहे. या पृष्ठभूमीवर १५ जुलै रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर व रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे पत्र लिहून अभयारण्याबाहेरच्या पर्यायी मार्गाचा विचार करावा, अशी मागणी केली आहे. या मागणीनंतर पर्यावरणवाद्यांसह बुलडाणा जिल्हा वासीयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी या मागणीचा मिळेल त्या व्यासपीठावरून सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे तर दुसरीकडे तेल्हारा तालुक्यातूनही हा रेल्वेमार्ग अकोला, हिवरखेड, तेल्हारा येथून पुढे संग्रामपूर, जळगाव जामोद येथून खंडवा येथे नेण्यात यावा, अशी मागणी पुढे आली आहे. तिकडे मेळघाटातही या मुद्यावर राजकारण तापले आहे. मेळघाटातील आदिवासी बांधवांकरिता ही रेल्वे महत्त्वाची असून, हा मार्ग पूर्ववत ठेवावा, अशी मागणी आता जोर धरत आहे. या मागणीसाठी भाजपाने पुढाकार घेतला असून, स्वातंत्र्यदिनी मेळघाटातील गावांमध्ये ग्रामपंचयातीने या मार्गासाठी ठराव केले आहेत.

भाजपाविरुद्धशिवसेना असा रंग येणार!अकोला ते खंडवा हा बहुप्रतीक्षित मार्ग पूर्ण व्हावा यासाठी अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांनी सातत्याने पुढाकार घेतला. या मार्गावर धावलेल्या अखेरच्या रेल्वेमध्ये प्रवास करून त्यांनी त्यांच्यासाठी हा मार्ग किती महत्त्वाचा आहे, हे अधोरेखित केले होते. सध्या पर्यावरणाच्या मुद्यावर एकीकडे न्यायालयात याचिका दाखल असताना राजकीय वातावरणही तापले आहे. या पृष्ठभूमीवर अमरावतीमध्ये भाजपाने आहे तोच मार्ग ही भूमिका घेत आंदोलन सुरू केले आहे, तर बुलडाण्यात सेनेचे खासदार असल्याने ते पर्याय मार्गाचे समर्थक आहेत, त्यामुळे या मुद्दाला भाजपा विरुद्ध शिवसेना असा रंग येण्याची चिन्हे आहेत.

 

टॅग्स :Akola-Khandwa Gauge Conversionअकोला-खांडवा गेज रूपांतरणAkolaअकोलाPoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाBJPभाजपा