शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारण आराखड्यास मान्यता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 10:52 IST

Water scarcity alleviation plan approved १२ कोटी ८५ लाख ७९ हजार रुपयांचा खर्च कृती आराखड्यात प्रस्तावित करण्यात आला.

अकोला: जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यास मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सोमवारी दिला. जिल्ह्यातील ४९७ गावांत पाणीटंचाई निवारणासाठी विविध ७१२ उपाययोजनांसाठी कामांसाठी १२ कोटी ८५ लाख ७९ हजार रुपयांचा खर्च कृती आराखड्यात प्रस्तावित करण्यात आला.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी जानेवारी ते जून या कालावधीसाठी विविध उपाययोजनांचा कृती आराखडा जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता. त्यानुषंगाने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक व जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता व संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यास मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी ८ मार्च रोजी दिला. मान्यता दिलेल्या पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यात जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील ४९७ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी विविध ७१२ उपाययोजनांच्या कामांसाठी १२ कोटी ८५ लाख ७९ हजार रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे.

आराखड्यात प्रस्तावित गावे व उपाययोजनांची संख्या

तालुका             गावे             उपाययोजना

अकोला             ९९             १२०

बार्शीटाकळी ५६             १३८

बाळापूर             २९             ६१

पातूर             ६७             ८८

मूर्तिजापूर             ७५             ९०

अकोट             ९७             ९७

तेल्हारा             ७४             ११८

............................................................................

एकूण             ४९७             ७१२

 

अशा आहेत प्रस्तावित उपाययोजना

पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यात विविध ७१२ उपाययोजनांची कामे प्रस्तावित आहेत. त्यामध्ये ३६ विहिरी खोल करणे व गाळ काढणे, २०० विहिरींचे अधिग्रहण करणे, १० टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, ७० नळयोजनांची विशेष दुरुस्ती, ११ तात्पुरत्या नळयोजना, १८७ नवीन विंधन विहिरी व १४९ नवीन कुपनलिका इत्यादी उपाययोजनांच्या कामांचा समावेश आहे.

टॅग्स :Akolaअकोलाwater scarcityपाणी टंचाई