शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
2
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
3
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
4
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
5
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
6
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
7
छपाई महाग; दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ
8
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
9
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
10
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
11
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
12
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
13
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
14
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
15
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
16
डॉ. दाभोलकर हत्या खटल्याचा आज निकाल; घटनेला १० वर्षे, अडीच वर्षे चालली सुनावणी
17
विलीनीकरण नव्हे, एकत्र काम करणार! शरद पवारांनी दिला चर्चेला पूर्णविराम; 'इंडिया'ला महाराष्ट्रात प्रचंड समर्थन
18
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
19
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
20
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा

अकोला जिल्हय़ाला ‘अवकाळी’चा तडाखा : पिके मातीत; स्वप्न भंगले! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 2:23 AM

अकोला : जिल्हय़ात अवकाळी पावसासह गारपिटीच्या तडाख्यात पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेतात कापणी झालेल्या हरभरा व गहू पिकांसह इतर पिके मातीत मिसळली. हाताशी आलेले पिकांचे उत्पादन बुडाल्याने, हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांचे स्वप्न भंगले आहे.

ठळक मुद्देशेतकरी हवालदिल

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हय़ात अवकाळी पावसासह गारपिटीच्या तडाख्यात पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेतात कापणी झालेल्या हरभरा व गहू पिकांसह इतर पिके मातीत मिसळली. हाताशी आलेले पिकांचे उत्पादन बुडाल्याने, हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांचे स्वप्न भंगले आहे.यावर्षीच्या गत पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत जिल्हय़ात खरीप हंगामातील मूग, उडीद पिकाचे उत्पादन बुडाले. सोयाबीन पिकाच्या उत्पादनात प्रचंड घट झाली असून, बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कपाशीचे उत्पादनही कमी झाले. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांनी रब्बी हंगामात हरभरा, गहू व इतर पिकांचे उत्पादन चांगले होण्याचे स्वप्न रंगविले होते; परंतु गत रविवार, ११ फेब्रुवारी रोजी जिल्हय़ातील सातही तालुक्यात अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसला. अवकाळी पाऊस व गारपिटीने जिल्हय़ातील विविध गावांत हरभरा, गहू या रब्बी पिकांसह संत्रा, केळी ही फळपिके आणि भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेतात कापणी झालेल्या हरभरा व गहू पिकांच्या पेंड्या अवकाळी पावसात भिजल्या असून, गारपिटीच्या तडाख्यात हरभरा व गहू मातीत मिसळला. अवकाळी पावसात भिजलेला कापूस गळून मातीत मिसळला तसेच कांदा व इतर भाजीपाला पिकेही मातीत मिसळली. हाताशी आलेली  पिके मातीत मिसळल्याने, पिकांचे उत्पादन बुडाले. त्यामुळे रब्बी हंगामात चांगल्या उत्पादनाचे शेतकर्‍यांचे स्वप्न भंगले आहे. त्यानुषंगाने हवालदिल झालेल्या जिल्हय़ातील शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी पीक नुकसान भरपाईची मदत  शासनामार्फत मदत मिळणार, याबाबतची प्रतीक्षा केली जात आहे.

उमई परिसरात गारपीट; अकोल्यात पाऊसउमईसह जांब, जितापूर नाकट, खरप ढोरे, समशेरपूर परिसरात मंगळवारी रात्री जोरदार गारपीट झाली. या गारपिटीमुळे सोंगणी करून ठेवलेल्या हरभरा आणि तूर पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. तर रात्री अकोला शहरात जोरदार पाऊस झाला. तसेच आलेगाव येथेही हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. 

पंचनाम्यानंतर समोर येणार पीक नुकसानाचे वास्तव!अवकाळी पावसासह गारपिटीच्या तडाख्यात जिल्हय़ात पिकांचे प्रचंड नुकसान झाले असले तरी, जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार जिल्हय़ातील सातही तालुक्यात केवळ ५ हजार ७३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार जिल्हय़ातील पीक नुकसानाचे पंचनामे तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांच्या पथकांमार्फत सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे अवकाळी पाऊस व गारपिटीच्या तडाख्यात जिल्हय़ातील पीक नुकसानाचे वास्तव पंचनामे पूर्ण झाल्यानंतरच समोर येणार आहे.

शेतात  कापणीनंतर हरभर्‍याच्या पेंड्या अवकाळी पावसात भिजल्या आणि हरभरा मातीत मिसळला. तसेच भिजलेला कापूस मातीत मिसळला. हाताशी आलेले पिकांचे उत्पादन बुडाल्याने शेतकरी संकटात सापडला. त्यामुळे पीक नुकसानाचे पंचनामे तातडीने पूर्ण करून, संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना सरकारने तातडीने मदत दिली पाहिजे.-शिवाजीराव भरणेशेतकरी, रामगाव 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीण