शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
3
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
4
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
5
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
6
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
7
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
8
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
9
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
10
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
11
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
12
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
13
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
14
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
15
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
16
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
17
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
19
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

अकोला जिल्हय़ाला ‘अवकाळी’चा तडाखा : पिके मातीत; स्वप्न भंगले! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 02:23 IST

अकोला : जिल्हय़ात अवकाळी पावसासह गारपिटीच्या तडाख्यात पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेतात कापणी झालेल्या हरभरा व गहू पिकांसह इतर पिके मातीत मिसळली. हाताशी आलेले पिकांचे उत्पादन बुडाल्याने, हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांचे स्वप्न भंगले आहे.

ठळक मुद्देशेतकरी हवालदिल

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हय़ात अवकाळी पावसासह गारपिटीच्या तडाख्यात पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेतात कापणी झालेल्या हरभरा व गहू पिकांसह इतर पिके मातीत मिसळली. हाताशी आलेले पिकांचे उत्पादन बुडाल्याने, हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांचे स्वप्न भंगले आहे.यावर्षीच्या गत पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत जिल्हय़ात खरीप हंगामातील मूग, उडीद पिकाचे उत्पादन बुडाले. सोयाबीन पिकाच्या उत्पादनात प्रचंड घट झाली असून, बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कपाशीचे उत्पादनही कमी झाले. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांनी रब्बी हंगामात हरभरा, गहू व इतर पिकांचे उत्पादन चांगले होण्याचे स्वप्न रंगविले होते; परंतु गत रविवार, ११ फेब्रुवारी रोजी जिल्हय़ातील सातही तालुक्यात अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसला. अवकाळी पाऊस व गारपिटीने जिल्हय़ातील विविध गावांत हरभरा, गहू या रब्बी पिकांसह संत्रा, केळी ही फळपिके आणि भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेतात कापणी झालेल्या हरभरा व गहू पिकांच्या पेंड्या अवकाळी पावसात भिजल्या असून, गारपिटीच्या तडाख्यात हरभरा व गहू मातीत मिसळला. अवकाळी पावसात भिजलेला कापूस गळून मातीत मिसळला तसेच कांदा व इतर भाजीपाला पिकेही मातीत मिसळली. हाताशी आलेली  पिके मातीत मिसळल्याने, पिकांचे उत्पादन बुडाले. त्यामुळे रब्बी हंगामात चांगल्या उत्पादनाचे शेतकर्‍यांचे स्वप्न भंगले आहे. त्यानुषंगाने हवालदिल झालेल्या जिल्हय़ातील शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी पीक नुकसान भरपाईची मदत  शासनामार्फत मदत मिळणार, याबाबतची प्रतीक्षा केली जात आहे.

उमई परिसरात गारपीट; अकोल्यात पाऊसउमईसह जांब, जितापूर नाकट, खरप ढोरे, समशेरपूर परिसरात मंगळवारी रात्री जोरदार गारपीट झाली. या गारपिटीमुळे सोंगणी करून ठेवलेल्या हरभरा आणि तूर पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. तर रात्री अकोला शहरात जोरदार पाऊस झाला. तसेच आलेगाव येथेही हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. 

पंचनाम्यानंतर समोर येणार पीक नुकसानाचे वास्तव!अवकाळी पावसासह गारपिटीच्या तडाख्यात जिल्हय़ात पिकांचे प्रचंड नुकसान झाले असले तरी, जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार जिल्हय़ातील सातही तालुक्यात केवळ ५ हजार ७३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार जिल्हय़ातील पीक नुकसानाचे पंचनामे तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांच्या पथकांमार्फत सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे अवकाळी पाऊस व गारपिटीच्या तडाख्यात जिल्हय़ातील पीक नुकसानाचे वास्तव पंचनामे पूर्ण झाल्यानंतरच समोर येणार आहे.

शेतात  कापणीनंतर हरभर्‍याच्या पेंड्या अवकाळी पावसात भिजल्या आणि हरभरा मातीत मिसळला. तसेच भिजलेला कापूस मातीत मिसळला. हाताशी आलेले पिकांचे उत्पादन बुडाल्याने शेतकरी संकटात सापडला. त्यामुळे पीक नुकसानाचे पंचनामे तातडीने पूर्ण करून, संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना सरकारने तातडीने मदत दिली पाहिजे.-शिवाजीराव भरणेशेतकरी, रामगाव 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीण