अकोला जिल्ह्यातील पिके उदध्वस्त!

By Admin | Updated: March 3, 2015 01:15 IST2015-03-03T01:15:59+5:302015-03-03T01:15:59+5:30

अवकाळी पावसाचा फटका, १ मार्चपर्यंत २७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान.

Akola district crushed crops! | अकोला जिल्ह्यातील पिके उदध्वस्त!

अकोला जिल्ह्यातील पिके उदध्वस्त!

राजरत्न सिरसाट/अकोला : शनिवारपासून विदर्भात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून, पश्‍चिम विदर्भातील पाच जिल्हय़ात गहू, हरभरा या रब्बी पिकांसह भाजीपाला, फळपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. २८ ते १ मार्चपर्यंत गारपीट आणि वादळी वार्‍यांसह आलेल्या पावसाने या पाच जिल्हय़ात २७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाला प्राप्त झाला आहे.
पश्‍चिम विदर्भातील अकोला, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ आणि अमरावती याच पाच जिल्हय़ात गेल्या पावसाळ्य़ात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने सर्वच खरीप पिकांचे उत्पादन घटले आहे. रब्बी पिकावर आस लावून बसलेल्या शेतकर्‍यांना या पावसाने पीक एन काढणीच्यावेळी फटका दिल्याने रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
यामध्ये यवतमाळ जिल्हयात सर्वाधिक १७,४४६ हेक्टरवरील गहू, हरभरा, फळे आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाले असून, अमरावती जिल्हय़ात ७ हजार तर अकोला जिल्हय़ात १,८३0 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना या पावसाचा फटका बसला आहे.
यामध्ये १३,२00 हेक्टर हरभर्‍याचे क्षेत्र असून, गव्हाचे क्षेत्र १२,६00 आहे. १८१ हेक्टरवरील फळ पिकांचे नुकसान झाले आहे. २0८ हेक्टर क्षेत्रावरील भाजीपाला व इतर पिकांचे नुकसान झाले आहे.

Web Title: Akola district crushed crops!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.