शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

मुदत संपली; ३६ हजार शेतकरी पीक कर्जाविना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2020 10:45 AM

Crop Loan to Akola Farmer ३६ हजार ८६ शेतकऱ्यांना खरीप पीक कर्ज मिळालेच नसल्याचे वास्तव आहे.

- संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: खरीप हंगामासाठी ३० सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात १ लाख ६ हजार ४१४ शेतकऱ्यांना कर्जाचे वाटप करण्यात आले असून, कर्ज वाटपाची मुदत संपली; परंतु जिल्ह्यातील ३६ हजार ८६ शेतकऱ्यांना खरीप पीक कर्ज मिळालेच नसल्याचे वास्तव आहे.यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील १ लाख ४२ हजार ५०० शेतकºयांना १ हजार ११४ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनामार्फत ठरविण्यात आले होते. खरीप हंगामातील पीक कर्ज वाटपाची मुदत ३० सप्टेंबर रोजी संपली आहे. निश्चित करण्यात आलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत ३० सप्टेंबरपर्यंत बँकांमार्फत जिल्ह्यातील १ लाख ६ हजार ४१४ शेतकºयांना ८४५ कोटी ७६ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. खरीप हंगामातील कर्ज वाटपाची मुदत संपली; मात्र जिल्ह्यातील ३६ हजार ८६ शेतकºयांना कर्जाविनाच राहावे लागले.बँकनिहाय पीक कर्ज वाटपाचे वास्तव!जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत ३८ हजार ८० शेतकºयांना ३५० कोटी २४ लाख रुपये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत ५५ हजार ५१९ शेतकºयांना ३७७ कोटी ८८ लाख रुपये व ग्रामीण बँकेमार्फत १२ हजार ८१५ शेतकºयांना ११७ कोटी ६४ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले.रब्बी हंगामात ७,५०० शेतकºयांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट!यावर्षीच्या रब्बी हंगामात जिल्ह्यातील ७ हजार ५०० शेतकºयांना ६० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्यानुसार १ आॅक्टोबरपासून पीक कर्ज वाटप सुरू करण्यात आले आहे.खरीप हंगामासाठी ३० सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील १ लाख ६ हजार ४१४ शेतकºयांना ८४५ कोटी ७६ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. रब्बी हंगामासाठी १ आॅक्टोबरपासून कर्जाचे वाटप सुरू करण्यात आले आहे.- आलोक तारेणियाव्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक

 

 

टॅग्स :Crop Loanपीक कर्जAkolaअकोलाFarmerशेतकरी