ग्रामीण भागातील शेती नुकसानीची कृषिमंत्र्यांनी केली पाहणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:19 IST2021-07-26T04:19:00+5:302021-07-26T04:19:00+5:30

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती विमा कंपनीस तातडीने (७२ तासांच्या आत) द्यावी, असे आवाहन माजी सैनिक कल्याण व कृषिमंत्री दादाजी ...

Agriculture Minister inspects agricultural losses in rural areas! | ग्रामीण भागातील शेती नुकसानीची कृषिमंत्र्यांनी केली पाहणी!

ग्रामीण भागातील शेती नुकसानीची कृषिमंत्र्यांनी केली पाहणी!

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती विमा कंपनीस तातडीने (७२ तासांच्या आत) द्यावी, असे आवाहन माजी सैनिक कल्याण व कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी शेतकऱ्यांना केले. यावेळी आमदार नितीन देशमुख, जिल्हाधिकारी निमा अरोरा, उपविभागीय अधिकारी नीलेश अपार, जिल्हा कृषी अधिकारी कोताप्पा खोत आदींची उपस्थिती होती. अतिवृष्टीमुळे नदी व नाल्याकाठच्या शेताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, या नुकसानग्रस्त क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून त्यांना पूर्णपणे सहकार्य करण्याचे आश्वासन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी दिले. अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. अतिवृष्टीमुळे ज्या भागात पाणी जमा होऊन पाण्याचा निचरा होत नाही, अशा भागात कायमस्वरूपी उपाययोजना करण्याकरिता तज्ज्ञ व शेतकऱ्यांच्या समन्वयाने नियोजन करू, असेही कृषिमंत्री भुसे यांनी सांगितले.

फोटो :

Web Title: Agriculture Minister inspects agricultural losses in rural areas!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.