शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

४४० व्हॉट्सॲप ग्रुपव्दारे शेतकऱ्यांच्या बांधावर निविष्ठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 10:41 AM

Akola News : कृषी सहायकांनी जिल्ह्यात ४४० ग्रुप तयार केले असून ३५ हजार ४७० शेतकऱ्यांचा सहभाग आहे.

 अकोला : कोरोना काळात गर्दी कमी करून संसर्ग टाळणे अत्यंत आवश्यक आहे; मात्र खरीप हंगाम समोर असल्याने शेतकऱ्यांना वेळेवर खते-बियाणे उपलब्ध करून देणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. याकरिता कृषी सेवा केंद्रांसोबत जुळलेल्या शेतकऱ्यांचे व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून बांधावर बियाणे-खते पोहोचविण्याचे काम सुरू आहे. कृषी सहायकांनी जिल्ह्यात ४४० ग्रुप तयार केले असून ३५ हजार ४७० शेतकऱ्यांचा सहभाग आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी केंद्रामध्ये न जाता कृषी निविष्ठा बांधावर मिळत आहे.मागील सव्वा वर्षांपासून कोरोना संकट वाढत आहे. त्यामुळे वेळोवेळी लॉकडाऊन, संचारबंदीच्या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. काही दिवसांवर खरीप हंगाम आला आहे. शेतकऱ्यांकडून बी-बियाणांची खरेदी सुरू झाली आहे. यादरम्यान कृषी सेवा केंद्रांवर होणारी गर्दी पाहता कृषी विभागाने नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावात व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून शेतकऱ्यांच्या बांधावर खते, बियाणे पोहोचविण्याचे काम सुरू आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात कृषी सहायकांनी हे ग्रुप तयार केले असून या ग्रुपचे ॲडमिनही ते स्वत:च आहे. या ग्रुपमध्ये कृषी सेवा केंद्राचे मालक व त्या केंद्रासोबत वर्षानुवर्षापासून जुळलेले शेतकरी सहभागी आहे. यामध्ये कृषी सहायक समन्वय करत आहे.

 

ग्रुपवर नोंदवावी लागेल मागणी

शेतकऱ्यांना आपल्या नावासह लागणारे बियाणे आणि खतांची मागणी व्हॉट्सॲप ग्रुपवर नोंदवावी लागणार आहे. कृषी सेवा केंद्राचे मालक नोंदविलेल्या मालाची रक्कम आणि एकत्रितपणे वाहतुकीसाठी लागणाऱ्या खतांची माहिती ग्रुपवर देतील.

 

रक्कमही पाठवावी लागेल ऑनलाईन

मागणी नोंदविल्यानंतर शेतकऱ्यांनी निविष्ठांची रक्कम ऑनलाईन पाठवायची आहे. पैसे मिळाल्यानंतर कृषी सेवा केंद्राचे मालक मागणीनुसार खते-बियाणे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोच करतील.

 

असा होणार फायदा

अशा प्रकारे उपक्रम राबविल्यास दुकानात गर्दी होणार नाही. परिणामी, कोरोना संसर्ग टाळता येतो.

किमतीपेक्षा जास्त दराने विक्री होणार नाही. तसेच लिकिंग करता येणार नाही.

शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही व इतर निविष्ठांचे क्षेत्रनिहाय सूक्ष्म नियोजन करता येईल.

शेतकऱ्यांना वेळेत बांधापर्यंत खते-बियाणे मिळणार असल्याने त्यांच्या वेळ व खर्चात बचत होईल आणि पेरणी वेळेवर करणे सोईचे हाईल.

 

तालुकानिहाय व्हॉट्सॲप ग्रुप

तालुका ग्रुप

अकोला ११०

बार्शीटाकळी ५५

मूर्तिजापूर २५

अकोट ९०

तेल्हारा ३५

बाळापूर ९३

पातूर            ३२

 

व्हॉट्सॲप ग्रुपव्दारे शेतकऱ्यांकडून मागणी नोंदविणे सुरू आहे. प्राप्त मागणीप्रमाणे निविष्ठा पोहोचविण्याचे काम सुरू झाले. तसेच ग्रुपव्दारे इतर विस्ताराचे कामही सुरू आहे.

- डॉ. कांतप्पा खोत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी