शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
2
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
3
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा
4
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
5
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
6
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
7
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
8
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
9
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
10
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
11
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
12
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
13
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
14
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
15
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
16
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
17
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
18
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
19
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
20
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'

कृषी कायदा शेतकरी हिताचा; विरोधकांकडून राजकारण - संजय धाेत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 7:33 PM

Sanjay Dhotre News हक्कावर, अधिकारांवर काेणतीही गदा येणार नसल्याचे केंद्रीय राज्यमंत्री संजय धाेत्रे यांनी स्पष्ट केले.

अकाेला : केंद्र शासनाने मंजूर केलेल्या कृषी कायद्याला विराेध दर्शवित पंजाब व हरियाणा येथील शेतकऱ्यांनी दिल्ली येथे आंदाेलन छेडले. सुधारित कायद्यामुळे त्या दाेन्ही राज्यांतील गव्हाच्या खरेदी प्रक्रियेवरून शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाची स्थिती असून, त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी केंद्र शासन तयार आहे. नवीन कृषी कायदा शेतकरी हिताचा असताना काही राजकीय पक्षांकडून नाहक राजकारण केले जात असून, यामुळे गरजू शेतकरी भरडला जाण्याची शक्यता असल्याचे सांगत केंद्रीय राज्यमंत्री संजय धाेत्रे यांनी साेमवारी आयाेजित ऑनलाइन पत्रकार परिषदेत केंद्र शासनाच्या धाेरणाविषयी माहिती दिली.

नवीन कृषी कायद्यानुसार शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल काेणत्याही बाजारपेठेत विकता येणार आहे. सध्याची बाजार समित्यांची व्यवस्था भविष्यातही कायम राहणार आहे. करार शेती (काॅन्ट्रॅक्ट फार्मिंग) शेतकऱ्यांसाठी नवा विषय नाही. आज राेजी महाराष्ट्रात ७० टक्के शेतकरी अल्पभूधारक असून, त्यांना पेरणीसाठी येणारा खर्च व उत्पादन लक्षात घेता शेती हा व्यवसाय ताेट्यात असल्याचे दिसून येते. अशा शेतकऱ्यांसाठी करार शेती फायद्याची ठरणार असून, यामुळे त्यांच्या मालकी हक्कावर, अधिकारांवर काेणतीही गदा येणार नसल्याचे केंद्रीय राज्यमंत्री संजय धाेत्रे यांनी स्पष्ट केले. किमान आधारभूत किमतीच्या मुद्यावर जाणीवपूर्वक गैरसमज पसरवला जात आहे. यापुढेही अन्नधान्याची खरेदी ‘एमएसपी’नुसारच सुरू राहणार असून, याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अनेकदा स्पष्ट केले आहे. देशात विविध राज्यात करार शेतीचे कायदे यापूर्वीच अमलात आणले असून, शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळत असल्याचे यावेळी केंद्रीय राज्यमंत्री धाेत्रे यांनी सांगितले.

 

शेतकऱ्यांनाे विश्वास ठेवा; बदल स्वीकारा!

मागील सहा वर्षांच्या कालावधीत शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र शासनाने विविध याेजनांची अंमलबजावणी केली. पीएम किसान याेजना असाे वा किसान आत्मसन्मान याेजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ६ हजार रुपये अनुदान दिले. यावर ९२ हजार काेटी रुपये खर्च झाले असून, ही मदत यापुढेही कायम राहील. शेतकऱ्यांनी काळानुरूप बदल स्वीकारला पाहिजे. त्यांची कदापिही फसगत हाेणार नाही, असे ना. संजय धाेत्रे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Sanjay Dhotreसंजय धोत्रेPoliticsराजकारणAkolaअकोलाBJPभाजपा