शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

चार हजार किमीनंतर ज्येष्ठांनाही प्रवास भाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 12:29 PM

चार हजार किलोमीटर संपताच पूर्ण तिकीट काढून प्रवास करावा लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : वर्षभरात कितीही प्रवास केला तरी अर्धे तिकीट लागेल, या अलिखित सवलतीला ज्येष्ठ नागरिकांना आता मुकावे लागणार आहे. स्मार्ट कार्ड मिळताच प्रवासाचा हिशेब सुरू होणार आहे. चार हजार किलोमीटर संपताच पूर्ण तिकीट काढून प्रवास करावा लागणार आहे.ज्येष्ठ नागरिकांना अर्ध्या तिकिटात वर्र्षभरात चार हजार किमीचा प्रवास करता येतो; मात्र त्याची मोजणी होत नव्हती. आधार कार्ड, मतदान कार्ड या आधारे अर्धे तिकीट दिले जात होते. या मर्यादेपासून सवलत घेणारही अनभिज्ञ होते. आता एसटी महामंडळ सवलत घेणाऱ्यास स्मार्ट कार्ड देण्यात येत आहे.१ एप्रिल ते ३१ मार्च, अशी एक वर्ष स्मार्ट कार्डची मुदत राहील. प्रत्येक वर्षी नूतनीकरण करावे लागेल. ज्येष्ठ नागरिकांचे स्मार्ट कार्ड मशीनद्वारे स्वाइप केले जातील. याद्वारे कार्डधारकांनी नेमका किती प्रवास केला, याची माहिती वाहकाला मिळणार आहे. प्रवास सवलत चार हजार किमीचा हिशेब प्रत्येक प्रवासात होणार आहे. चार हजार किलोमीटर संपले की, वाहक पूर्ण तिकीट फाडणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना आता आपण किती प्रवास केला, याची मोजदाद करावी लागणार आहे. स्मार्ट कार्डची नोंदणी केली जात आहे.ज्यांच्याकडे स्मार्ट कार्ड नाही, त्यांच्याकडील आधार कार्ड पाहून त्यांना अर्ध्या तिकिटाने प्रवास करू दिला जाणार आहे. पुढील काळात मात्र अर्ध्या तिकिटासाठी आधार तुटणार आहे. स्मार्ट कार्ड योजना लागू झाल्याने प्रवासादरम्यान होणारी बोगसगिरी आणि महामंडळाचे होणारे नुकसान थांबणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड दिले जाणार असल्याने आधार कार्ड, मतदान कार्डची गरज नाही. स्मार्ट कार्ड तयार करण्यासाठी ज्येष्ठांना ५५ रुपये शुल्क आकारले जात आहे. आॅनलाइन नोंदणीनंतर स्मार्ट कार्ड आधारशी लिंक केले जाते.महाराष्ट्र राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार धोरणात्मक नियमावली लावून दिली आहे. त्यानुसार स्मार्ट कार्डच्या सवलती राज्यभरात देण्यात येत आहेत.-चेतना खिरवाळकर, विभागीय नियंत्रक, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाstate transportएसटी