शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

सिंचन क्षेत्रासोबतच उत्पादकता वाढवावी लागेल! - जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 19:58 IST

आंतरराष्टÑीय जल सिंचन व जल निस्सारण आयोगाचे माजी सरकार्यवाह डॉ.माधवराव चितळे अकोल्यात आले असताना ‘लोकमत’शी बातचित करताना त्यांनी पाणी विषयावर सर्वच अनुषंगाने माहिती दिली.

 

- राजरत्न सिरसाट

अकोला : सिंचन क्षेत्रात वाढ होत असून, सिंचन आयोगाच्या अहवालाच्या आकडेवारीवरू न हे समोर आले आहे.आता  प्रतिघनमिटर  पाण्याची उत्पादकता वाढवणे हे खरे काम आहे. तदव्तच पाणी व्यवस्थापन काळाची गरज असल्याने लोकांचा सहभाग व जागरू कता वाढवावी लागणार आहे. सिंचन परिषदेतून हाच संदेश देण्याचा प्रयत्न असल्याची माहिती आंतरराष्टÑीय जल सिंचन व जल निस्सारण आयोगाचे माजी सरकार्यवाह डॉ. माधवराव चितळे यांनी रविवारी दिली.

दोन दिवसीय २० वी महाराष्ट्र सिंचन परिषद येथे आयोजित करण्यात आली होती,या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी डॉ. चितळे अकोल्यात आले असताना ‘लोकमत’शी बातचित करताना त्यांनी पाणी विषयावर सर्वच अनुषंगाने माहिती दिली. 

 - सिंचनाचा तर अनुशेष आहे ?उत्तर-  सिंचन आयोगाच्या ताज्या अहवालानुसार सिंचनाचे क्षेत्र वाढत असल्याचे समोर आले आहे. विदर्भातही या अनुषंगाने काम होत आहे पंरतु खरी गरज आहे ती भूपृष्ठावर पावसाचे पाणी साठविण्याची.ती क्षमता आपण निर्माण न केल्याने पावसाचे पाणी समुद्राकडे वाहून जात आहे.आजमितीस आपण केवळ ३० टक्के पाण्याचा साठा करू  शकलो. 

- पाणी साठविण्यासाठी काय करावे?उत्तर- साठे तयार करावे लागणार आहेत.तदव्तच मुलस्थानी जलसंवर्धनही करावे लागेल.राहणीमान बदलले असून, पाण्याचा वापर वाढला आहे.शेती,उद्योग आदी विकासाला वर्षाकाठी किती पाणी लागते याचा ताळेबंद ठेवावा लागणार आहे. 

- जलप्रदुषणावर उपाययोजना अपुºया पडतात का ?उत्तर- हे प्रशासकीय आव्हान आहे. यासाठी कडक कायदे करण्यात आले आहेत.त्याचा वापर केला पाहिजे.नद्या,ओढे, तलाव आदी ठिकाणी लोकांनी कचरा,घाण टाकणे टाळले पाहिजे ,नद्याच्या काठचे अतिक्रमण काढून नद्यांचा श्वास मोकळा करणे तेवढेच अत्यावश्यक आहे. त्यासाठी लोकांनी पाण्यावर प्रेम करावे,त्यासाठीची जनजागृती करावी लागणार असून, शहर ते ग्राम पातळीवर विविध समित्या स्थापन कराव्या.या समित्यांचे संचालन जिल्हा परिषद,पंचायत समित्या,ग्राम पंचायतीमार्फत होणे गरजेचे आहे.व्यापक स्वरू पात जनजागृती होईल.

-  खारपाणपट्टयासाठी कोणत्या उपाययोजना राबवाव्यात?उत्तर- विदर्भातील खारपाणपट्ट्यात नवीन स्वच्छ पावसाचे पाणी मुलस्थानी साठवणूक व जिरवावे लागले.

- जलतिनीचा फायदा झाला का? उत्तर- पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांनी पहिली जलनिती ठरविण्यासाठी पुढाकार घेतला होता.त्याचा फायदा झाला आहे.आता खरी गरज आहे ती भूपृष्ठावर पाणी वाढविण्याची.त्यांनतर दुसरी जलनिती ठरविण्यात आली त्यामध्ये किरकोळ बदल करण्यात आले.

टॅग्स :Akolaअकोलाinterviewमुलाखत