शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील मतमोजणी पुढे ढकलणारी याचिका कोणी केली होती? वर्ध्यात सगळा घोळ झाला, या पक्षाच्या उमेदवाराने....
2
कर्नाटकच्या राज्यपालांच्या नातसुनेचा गंभीर आरोप! पतीकडून ५० लाख हुंड्यासाठी छळ, टेरेसवरून धक्का दिला
3
पत्रकाराने प्रश्न विचारला,रेणुका चौधरी यांनी भौ-भौ करत दिले उत्तर; व्हिडीओ व्हायरल
4
विराट कोहली १६ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार; प्रत्येक सामन्यासाठी 'इतकी' मॅच फी मिळणार
5
अफगाणिस्तानात तालिबानची क्रूर शिक्षा: ८० हजार लोकांसमोर १३ वर्षांच्या मुलाने आरोपीला गोळ्या घातल्या...
6
'केंद्र सरकारने सत्य उघडले'; महाराष्ट्र शासनाने कर्जमाफीचा प्रस्तावच पाठवला नाही; सुप्रिया सुळेंची टीका
7
तपोवन वृक्षतोडी विरोधातील आंदोलनाला अजित पवारांचा पाठिंबा; म्हणाले, झाडं वाचली तरच पुढची पिढी..."
8
USD to INR: का होतेय भारतीय रुपयामध्ये घसरण? आशियातील सर्वात वाईट कामगिरी करणाऱ्या चलनांमध्ये सामिल
9
डोळ्याला मोठा भिंगाचा चष्मा आणि पुढे आलेले दात; जस्सीचा बदलला लूक, आता ओळखताही येत नाही
10
IND vs SA 2nd ODI Live Streaming: टीम इंडियानं सलग २० व्या वनडेत गमावला टॉस! मॅचसह मालिका जिंकणार?
11
देशात घुसखोरांच्या स्वागतासाठी लाल गालीचा अंथरणे योग्य आहे का?, सुप्रीम  कोर्टाने विचारला सवाल
12
वृक्षतोडीचं राजकारण करणाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडून 'शाळा'; म्हणाले, झाडं जपायलाच हवीत, पण कुंभमेळ्याची संस्कृतीही...
13
गौरी पालवे मृत्यू प्रकरण: तीन वर्षांपासून आमचे संबंध नाही; अनंत गर्जेच्या प्रेयसीने पोलिसांना काय सांगितले?
14
'ही काही फॅक्टरी नाहीये...', दीपिका पादुकोणच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर राणा दग्गुबती स्पष्ट मत
15
आता १९ नव्हे, 'या' ३० देशांच्या लोकांना अमेरिकेत 'नो एन्ट्री'! डोनाल्ड ट्रम्प कायदे आणखी कठोर करणार
16
Tatkal Ticket: ...तर आरक्षण खिडकीवरून तत्काळ तिकीट मिळणार नाही; नवा नियम लवकरच लागू!
17
Dollar Vs Rupee: अरे बाप रे... १ डॉलर = ₹ ९०.१३ ! भारतीय रुपयाची ऐतिहासिक घसरण; तुमच्या खिशावर कसा होईल परिणाम?
18
भारत भेटीपूर्वी पुतिन यांचे मोठे पाऊल; रशियाने भारतासोबत लष्करी कराराला दिली मान्यता
19
६० व्या वर्षी ₹५००० चं पक्कं पेन्शन, पात्रतेसोबत जाणून घ्या अर्ज करायची स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
20
School Holiday: तामिळनाडूत शाळा बंद, जम्मू काश्मीरसह MP, UP मध्येही शाळांना दिर्घ काळ सुट्टी घोषित, कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन क्षेत्रासोबतच उत्पादकता वाढवावी लागेल! - जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 19:58 IST

आंतरराष्टÑीय जल सिंचन व जल निस्सारण आयोगाचे माजी सरकार्यवाह डॉ.माधवराव चितळे अकोल्यात आले असताना ‘लोकमत’शी बातचित करताना त्यांनी पाणी विषयावर सर्वच अनुषंगाने माहिती दिली.

 

- राजरत्न सिरसाट

अकोला : सिंचन क्षेत्रात वाढ होत असून, सिंचन आयोगाच्या अहवालाच्या आकडेवारीवरू न हे समोर आले आहे.आता  प्रतिघनमिटर  पाण्याची उत्पादकता वाढवणे हे खरे काम आहे. तदव्तच पाणी व्यवस्थापन काळाची गरज असल्याने लोकांचा सहभाग व जागरू कता वाढवावी लागणार आहे. सिंचन परिषदेतून हाच संदेश देण्याचा प्रयत्न असल्याची माहिती आंतरराष्टÑीय जल सिंचन व जल निस्सारण आयोगाचे माजी सरकार्यवाह डॉ. माधवराव चितळे यांनी रविवारी दिली.

दोन दिवसीय २० वी महाराष्ट्र सिंचन परिषद येथे आयोजित करण्यात आली होती,या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी डॉ. चितळे अकोल्यात आले असताना ‘लोकमत’शी बातचित करताना त्यांनी पाणी विषयावर सर्वच अनुषंगाने माहिती दिली. 

 - सिंचनाचा तर अनुशेष आहे ?उत्तर-  सिंचन आयोगाच्या ताज्या अहवालानुसार सिंचनाचे क्षेत्र वाढत असल्याचे समोर आले आहे. विदर्भातही या अनुषंगाने काम होत आहे पंरतु खरी गरज आहे ती भूपृष्ठावर पावसाचे पाणी साठविण्याची.ती क्षमता आपण निर्माण न केल्याने पावसाचे पाणी समुद्राकडे वाहून जात आहे.आजमितीस आपण केवळ ३० टक्के पाण्याचा साठा करू  शकलो. 

- पाणी साठविण्यासाठी काय करावे?उत्तर- साठे तयार करावे लागणार आहेत.तदव्तच मुलस्थानी जलसंवर्धनही करावे लागेल.राहणीमान बदलले असून, पाण्याचा वापर वाढला आहे.शेती,उद्योग आदी विकासाला वर्षाकाठी किती पाणी लागते याचा ताळेबंद ठेवावा लागणार आहे. 

- जलप्रदुषणावर उपाययोजना अपुºया पडतात का ?उत्तर- हे प्रशासकीय आव्हान आहे. यासाठी कडक कायदे करण्यात आले आहेत.त्याचा वापर केला पाहिजे.नद्या,ओढे, तलाव आदी ठिकाणी लोकांनी कचरा,घाण टाकणे टाळले पाहिजे ,नद्याच्या काठचे अतिक्रमण काढून नद्यांचा श्वास मोकळा करणे तेवढेच अत्यावश्यक आहे. त्यासाठी लोकांनी पाण्यावर प्रेम करावे,त्यासाठीची जनजागृती करावी लागणार असून, शहर ते ग्राम पातळीवर विविध समित्या स्थापन कराव्या.या समित्यांचे संचालन जिल्हा परिषद,पंचायत समित्या,ग्राम पंचायतीमार्फत होणे गरजेचे आहे.व्यापक स्वरू पात जनजागृती होईल.

-  खारपाणपट्टयासाठी कोणत्या उपाययोजना राबवाव्यात?उत्तर- विदर्भातील खारपाणपट्ट्यात नवीन स्वच्छ पावसाचे पाणी मुलस्थानी साठवणूक व जिरवावे लागले.

- जलतिनीचा फायदा झाला का? उत्तर- पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांनी पहिली जलनिती ठरविण्यासाठी पुढाकार घेतला होता.त्याचा फायदा झाला आहे.आता खरी गरज आहे ती भूपृष्ठावर पाणी वाढविण्याची.त्यांनतर दुसरी जलनिती ठरविण्यात आली त्यामध्ये किरकोळ बदल करण्यात आले.

टॅग्स :Akolaअकोलाinterviewमुलाखत