शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर ठरविण्यासाठी कृती कार्यक्रम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 00:07 IST

अकोला : राज्यातील प्रत्येक जिल्हय़ात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून, या वर्षीच्या संकलित चाचणी २ मध्ये सर्व प्राथमिक शाळांतील शंभर टक्के विद्यार्थी प्रगत झाले पाहिजेत. या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर ठरविण्यासाठी शिक्षण विभागामार्फत कृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. 

ठळक मुद्देराज्यातील प्रत्येक जिल्हय़ात करण्यात येणार प्रभावी अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्यातील प्रत्येक जिल्हय़ात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून, या वर्षीच्या संकलित चाचणी २ मध्ये सर्व प्राथमिक शाळांतील शंभर टक्के विद्यार्थी प्रगत झाले पाहिजेत. या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर ठरविण्यासाठी शिक्षण विभागामार्फत कृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेने जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा भाषा व गणित विषयातील अध्ययन स्तर १९ ते २५ जानेवारी या कालावधीत निश्‍चित करून गटशिक्षणाधिकार्‍यांनी त्यासाठी नियोजन करावे. यासोबतच तालुक्यातील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर गटशिक्षणाधिकारी शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, विषय साधन व्यक्ती यांनी निश्‍चित करतील. तसेच जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेचे प्राचार्य, वरिष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता, माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी हे सुद्धा प्रत्येकी एका शाळेतील विद्यार्थ्यांच्या भाषा व गणित विषयाचा अध्ययन स्तर निश्‍चित करतील. त्याची माहिती दिलेल्या संकेतस्थळावर त्याच दिवशी भरतील. स्तर निश्‍चितीची माहिती संबंधित वर्ग शिक्षकास देऊन माहिती शाळेच्या शेरेबुकात नोंद करावी. वर्गातील अप्रगत विद्यार्थ्यांचा अप्रगत विषयांसाठी (भाषा व गणित) कृती कार्यक्रम वर्गशिक्षक, विषय शिक्षकांनी तयार कारावा. यासह इतरही कृती कार्यक्रम ठरविण्यात आले आहे.

शाळांमध्ये पायाभूत चाचणी, संकलित परीक्षा १ घेण्यात आली. यात विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांच्या आधारे शिक्षकांनी अध्ययन स्तर निश्‍चित करावा आणि त्यानंतर कृती कार्यक्रमाचे नियोजन करावे. आम्ही प्रत्येक शाळेतील एक शिक्षक प्रशिक्षित केलेला आहे. - डॉ. प्रकाश जाधव प्राचार्य, जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था

टॅग्स :educationशैक्षणिकSchoolशाळाStudentविद्यार्थी