शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

निकालानंतर आरोप-पत्यारोप सुरू; अभय पाटील म्हणाले, "आंबेडकरांचे राजकारण काँग्रेसला पाडण्यासाठीच"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2024 19:12 IST

वंचित म्हणते, "अभय पाटील यांनी इतिहासात डोकून पहावे"

मनोज भिवगडे -

अकोला : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता आरोप-पत्यारोप सुरू झाले आहेत. काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांनी माध्यमांसोबत बोलताना वंचित बहुजन आघाडीचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे राजकारण काँग्रेसला पाडण्यासाठी व भाजपला मदत करण्यासाठी असल्याचा आरोप केला आहे. त्यावर वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी डॉ. अभय पाटील यांना प्रत्युत्तर देताना काँग्रेसने गेल्या दोन निवडणुकीत काय केले होते, याची आठवण करून देत इतिसाहात डोकावून बघण्याचा सल्ला दिला आहे.

अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी यांच्यात झालेल्या मतविभाजनामुळे भाजपचा विजय झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. काँग्रेसला ४० हजार मतांनी निसटता पराभव पत्करावा लागला. याबाबत माध्यमांशी बोलताना डॉ. पाटील यांनी आंबेडकर यांची भूमिका भाजपला पूरक असल्याचा आरोप केला. त्यावर वंचितचे पातोडे यांनी निवडणूक काळात केलेली टीका ही राजकीय स्वरुपाची होती. जनतेसमोर वस्तूस्थिती मांडण्याच्या दृष्टीने केलेली ती टीका होती. त्यामुळे पाटील यांनी केलेल्या आरोपात तथ्य नाही. यापूर्वीच्या दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसने बाळासाहेबांचा पराभव व्हावा या उद्देशानेच उमेदवार दिला होता, हे पाटील यांनी विसरू नये. त्यामुळे पुढे टीका करताना अभ्यास करूनच बोलावे, असा सल्लाही वंचित बहुजन आघाडीने पाटील यांना दिला आहे. 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Akolaअकोलाcongressकाँग्रेसBJPभाजपा