शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे; ५ जुलैला होणारा ठाकरे बंधुंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

दुष्काळी मदत वाटपाचा मागितला लेखाजोखा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 13:04 IST

तातडीने माहिती सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी जिल्ह्यातील संबंधित पाच तहसीलदारांना पत्राद्वारे दिले.

- संतोष येलकरअकोला: जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त पाच तालुक्यांतील शेतकऱ्यांसाठी १३७ कोटी ३१ लाख २४ हजार ५६२ रुपयांची मदत वितरित करण्यात आली; मात्र त्यापैकी किती मदतीची रक्कम बँकांमध्ये जमा करण्यात आली आणि प्रत्यक्ष किती शेतकºयांच्या बँक खात्यात मदतीची किती रक्कम जमा करण्यात आली, यासंदर्भात लेखाजोखा मागत संबंधित माहिती तातडीने सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शनिवारी तहसीलदारांना पत्राद्वारे दिले.जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तअकोला, बाळापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा व मूर्तिजापूर या पाच तालुक्यांतील दुष्काळग्रस्त २ लाख १२ हजार शेतकºयांच्या मदतीसाठी मंजूर करण्यात आलेल्या दुष्काळी मदतनिधीपैकी शासनामार्फत तीन टप्प्यांत १३७ कोटी ३१ लाख २४ हजार ५६२ रुपयांचा मदतनिधी प्राप्त झाला. उपलब्ध मदतीची रक्कम दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयार्फत गत १ ते २६ फेबु्रवारीदरम्यान जिल्ह्यातील संबंधित पाच तहसील कार्यालयांना वितरित करण्यात आली. वितरित करण्यात आलेली मदतीची रक्कम दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी आतापर्यंत बँकांमध्ये किती रक्कम जमा करण्यात आली आणि बँकांमार्फत किती शेतकºयांच्या खात्यात किती रक्कम जमा करण्यात आली, यासंदर्भात तातडीने माहिती सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी जिल्ह्यातील संबंधित पाच तहसीलदारांना पत्राद्वारे दिले.दुष्काळग्रस्त शेतकºयांसाठी अशी वितरित करण्यात आली मदत!तालुका                  रक्कम (लाखांत)अकोला                    ३६,३७,९२,७४८बार्शीटाकळी             २२,६७,४८,६३८तेल्हारा                    २१,१६,२५,११५बाळापूर                  २८,०१,३७,६६७मूर्तिजापूर               २९,०८,२०,३९४................................................एकूण                      १३७,३१,२४,५६२जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त पाच तालुक्यांतील शेतकºयांसाठी १३१ कोटी ३१ लाख २४ हजार ५६२ रुपयांची मदत वाटप करण्यात आली. वितरित मदतीच्या रकमेपैकी बँकांमध्ये जमा केलेली मदतीची रक्कम आणि बँकांमार्फत आतापर्यंत प्रत्यक्ष किती शेतकºयांच्या खात्यात किती मदतीची रक्कम जमा करण्यात आली, यासंदर्भात तहसीलदारांकडून माहिती मागितली आहे. यासंदर्भात ६ मे रोजी बँक अधिकाºयांची बैठक घेण्यात येणार आहे.-जितेंद्र पापळकर,जिल्हाधिकारी.

 

टॅग्स :Akolaअकोलाdroughtदुष्काळFarmerशेतकरी