शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे किती विमान पाडले? हा प्रश्न विरोधकांच्या मनात कधी आला नाही; राजनाथ सिंह कडाडले
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
3
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
4
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
5
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?
6
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
7
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
8
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
9
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
10
कुठे गायब झाली 'तेरे नाम'मधील भिकारीची भूमिका करणारी अभिनेत्री? पूर्ण बदललाय तिचा लूक
11
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
12
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
13
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
14
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
15
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
16
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
17
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
18
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
19
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
20
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा

दोन हजार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण बाकीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 09:28 IST

Akola News : जिल्ह्यात २ हजार ५३ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्यापही बाकी आहे.

अकोला : दोन लाखांपर्यंत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणाऱ्या महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमुक्तीचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्याचे आधार प्रमाणीकरण आवश्यक आहे. जिल्ह्यात २ हजार ५३ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्यापही बाकी आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना लाभ मिळणार कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून नैसर्गिक, अनैसर्गिक संकटांमुळे आर्थिक स्थिती बिकट झालेल्या शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमुक्तीची घोषणा करून मोठा दिलासा दिला. अल्पावधीतच घोषणेची अंमलबजावणी करण्यासाठी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना तयार करून शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमुक्तीसुद्धा जाहीर केली. त्यानंतर प्रक्रिया गतीने राबवून जिल्हानिहाय पात्र शेतकऱ्यांच्या खात्याचे अपलोडिंग करण्यात आले व विनाअवकाश कर्जमुक्तीसाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावाच्या याद्या जाहीर सुद्धा करण्यात आल्या; परंतु कर्जमुक्तीचा प्रत्यक्ष लाभ मिळविण्यासाठी पात्रता यादीतील शेतकऱ्यांना त्यांचे आधार प्रमाणीकरण करणे गरजेचे असल्याचे योजनेच्या अटींमध्ये नमूद आहे.

महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेत सहकार विभागाने जिल्हा सहकारी बँक व अन्य खासगी-सार्वजनिक बँकांच्या मदतीने १ लाख १४ हजार ७४३ शेतकऱ्यांची नावे सरकारने या कर्जमाफी योजनेसाठी तयार केलेल्या स्वतंत्र संकेतस्थळावर अपलोड केली होती. त्यातील १ लाख ४ हजार ३६९ शेतकऱ्यांच्या बँक खात्यांचे आधार प्रमाणीकरणही करण्यात आले आहे. उर्वरित २ हजार ५३ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण बाकी राहिले आहे.

मृत शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण कसे होणार?

या याद्यांमधील हजारो शेतकरी हयात नसल्याने त्यांचे आधार प्रमाणीकरण करायचे कसे, ही मोठी समस्या निर्माण झाली आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAdhar Cardआधार कार्डFarmerशेतकरी