काटेपूर्णा धरणात ५१.२८ टक्के जलसाठा!
By Admin | Updated: August 2, 2016 01:51 IST2016-08-02T01:51:57+5:302016-08-02T01:51:57+5:30
यावर्षीची काळजी संपली : वानचे चार वक्रद्वार सलग चार दिवसांपासून उघडे.

काटेपूर्णा धरणात ५१.२८ टक्के जलसाठा!
अकोला : जिल्हय़ातील धरणांतील जलसाठय़ात वाढ झाली असून, अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्या आणि विस्ताराने मोठे असलेल्या काटेपूर्णा धरणात आजमितीस केवळ ४४.४३ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ५१.२८ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. दरम्यान, वान धरणाचे चार वक्रद्वार सोमवारी १0 सें.मी.उघडे होते; पाण्याचा विसर्ग २२.९४ घनमीटर प्रतिसेकंद सुरू आहे. पातूर तालुक्यातील मोर्णा मध्यम प्रकल्पात १७.२७ दलघमी (४१.६६ टक्के), निगरुणा २२.३४ दलघमी (७७.४३ टक्के)जलसाठा संकलीत झाला असून, मूर्तिजापूर तालुक्यातील उमा ७.0७६ दलघमी (६0.५४ टक्के), तेल्हारा तालुक्यातील वान ६१.0२ दलघमी (७४.४५ टक्के), अकोट तालुक्यातील पोपटखेड लपा ९.२६ दलघमी (८५.४१ टक्के) तर बाश्रीटाकळी तालुक्यातील दगडपारवा या धरणात १.७७ दलघमी म्हणजेच १७.२७ टक्के जलसाठा संचयित झाला आहे. जिल्हय़ातील ३२ पैकी १0 लघू प्रकल्प ओव्हरफ्लो आहेत.