शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

पश्चिम विदर्भातील धरणात ३९ टक्के जलसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 13:07 IST

अकोला : पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांत पावसाने दमदार हजेरी लावली असून, २३ जुलैपर्यंत पाच जिल्ह्यांत ३८.१९ टक्के जलसाठा संचयित झाला.

ठळक मुद्देअकोला शहराची जीवनवाहिनी असलेल्या काटेपूर्णा या मोठ्या धरणात आता कुठे ३३.१९ टक्के जलसाठा संकलित झाला आहे.बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा मोठ्या धरणातील जलसाठा संपला असून, अद्याप एक थेंबही वाढ झाली नाही. वाशिम जिल्ह्यातील अडाणमध्ये ५०.३० टक्के, एकबुर्जी धरणात ८६.७२ टक्के, तर सोनल धरणात ३४.५७ टक्के जलसाठा आहे.

अकोला : पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांत पावसाने दमदार हजेरी लावली असून, २३ जुलैपर्यंत पाच जिल्ह्यांत ३८.१९ टक्के जलसाठा संचयित झाला. पण, बुलडाणा जिल्ह्यात अद्याप अपेक्षित पाऊस झाला नसल्याने या जिल्ह्यातील तीन धरणाची जलपातळी शून्य टक्केच आहे. इतरही धरणातील जलसाठा अत्यल्पच आहे.पश्चिम विदर्भात नऊ मोठे, २४ मध्यम, तर ४५२ लघू प्रकल्प आहेत. यात अकोला शहराची जीवनवाहिनी असलेल्या काटेपूर्णा या मोठ्या धरणात आता कुठे ३३.१९ टक्के जलसाठा संकलित झाला आहे. याच जिल्ह्यातील निर्गुणा मध्यम धरणात ३४.९० टक्के जलसाठा झाला आहे. उमा २९.०२, मोर्णा धरणात २०.३८ टक्के, तर वाण धरणात आतापर्यंत ५८.७४ टक्के जलसाठा संकलित झाला. यामध्ये मागीलवर्षीचा ४८ टक्के जलसाठा शिल्लक होता. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा मोठ्या धरणातील जलसाठा संपला असून, अद्याप एक थेंबही वाढ झाली नाही. याच जिल्ह्यातील मस व कोराडी मध्यम धरणातील जलसाठा शून्य टक्के आहे. तोेरणा ७.६०, तर उतावळी धरणातील पातळी १४ टक्के झाली आहे. याच जिल्ह्यातील नळगंगा या मोठ्या धरणात १०.५३ टक्के, पेनटाकळी धरणात ४.५४ टक्के, ज्ञानगंगा मध्यम प्रकल्पात १७.४८ टक्के, पलढगमध्ये १२.६५ टक्के, मन धरणात १५.४० टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाणमध्ये ५०.३० टक्के, एकबुर्जी धरणात ८६.७२ टक्के, तर सोनल धरणात ३४.५७ टक्के जलसाठा आहे. अमरावती जिल्ह्यातील उर्ध्व वर्धा धरणात ४३.९२ टक्के, यवतमाळ जिल्ह्यातील पूसमध्ये ९०.५७, अरुणावती ३३.७२, तर बेंबळा धरणात ४०.६५ टक्केच जलसाठा आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाVidarbhaविदर्भDamधरण