शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
4
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
5
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
6
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
7
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
8
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
9
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
10
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
12
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
13
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
14
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
15
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
16
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
17
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
18
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
19
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
20
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री

३१० कोटींचा आराखडा; शासन म्हणते प्राधान्य ठरवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:37 IST

नवीन प्रभागांचा विकास : मनपाला २० टक्के रक्कम जमा करण्याची अट

आशिष गावंडे। लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महापालिका क्षेत्रात समाविष्ट झालेल्या नवीन प्रभागात विकास कामे करण्यासाठी सत्ताधारी भाजपाने ३१० कोटींचा विकास आराखडा तयार केला. नवीन प्रभागात नेमक्या कोणत्या कामांची गरज आहे, याकरिता प्राधान्यक्रम ठरविण्याचे निर्देश राज्य शासनाने महापालिकेला दिले आहेत. विकास आराखड्यासाठी निधी मंजूर झाल्यास त्यामध्ये मनपाने २० टक्के रक्कम जमा करण्याची अट नमूद असल्यामुळे ही रक्कम जमा करण्याचे मनपासमोर संकट उभे ठाकण्याची शक्यता आहे.शहरालगतच्या २४ गावांचा मनपा प्रशासनाद्वारे पुरवल्या जाणाऱ्या मूलभूत सोयी-सुविधांवर ताण पडत होता. यामध्ये रस्ते, पथदिवे, पाणीपुरवठा आदी बाबींचा समावेश होता. शहराचे भौगोेलिक क्षेत्रफळ, लोकसंख्या लक्षात घेता मनपा क्षेत्राची हद्दवाढ करणे गरजेचा असल्याचा मुद्दा लोकप्रतिनिधींनी शासनाकडे लावून धरला. महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी हद्दवाढीचा सुधारित प्रस्ताव पाठवल्यानंतर राज्य शासनाने ३० आॅगस्ट २०१६ रोजी महापालिका क्षेत्राच्या हद्दवाढीची अधिसूचना जारी केली. सद्यस्थितीत शहरालगतच्या प्रमुख १३ ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या २४ गावांचे मनपामध्ये विलीनीकरण झाले. या नवीन प्रभागात मूलभूत सोयी-सुविधाची दाणादाण उडाल्याचे चित्र आहे. प्रशस्त रस्ते, नाल्या-पथदिव्यांचा अभाव असून, तत्कालीन ग्रामपंचायतींच्या मूकसंमतीने उभारण्यात आलेल्या अनधिकृत इमारतींमुळे समस्येत भर पडली आहे. पाणीपुरवठ्याची कोणतीही यंत्रणा संबंधित भागात नसल्याने नागरिकांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येत होती. या सर्व बाबींचा विचार करून नवीन प्रभागांमध्ये ठोस कामे करण्याचा विकास आराखडा आमदार रणधीर सावरकर, आ. गोवर्धन शर्मा यांनी तयार केला होता. लोकप्रतिनिधींनी सुमारे १२० कोटींचा आराखडा मनपाकडे सुपूर्द केल्यानंतर सभागृहात भाजपाने विकास आराखड्यात दुरुस्ती करून ३१० कोटींचा आराखडा मंजूर केला. प्रशासनानेसुद्धा वेळ न दवडता प्रस्ताव शासनाकडे सादर केला. प्रस्ताव लक्षात घेता विकास कामांचा प्राधान्यक्रम ठरवा, त्यानंतर निधी मंजूर केला जाणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. टप्प्याटप्प्याने मिळणार निधी!नवीन प्रभागात निवडून आलेले नगरसेवक आणि प्रशासनाने समन्वय ठेवत विकास आराखडा तयार केला. तत्कालीन ग्रामपंचायतींच्या कार्यकाळात रस्ते, नाल्या, सर्व्हिस लाइन, पाइपलाइन, पथदिव्यांच्या सुविधेचा बोजवारा उडाल्याचे चित्र होते. शासनाकडून प्राप्त निधीचा योग्य वापर व्हावा, यासाठी धोरणात्मक विचार करून दर्जेदार विकास कामे करावे लागतील. प्राप्त निधीतून संबंधित कामे पूर्ण केल्यानंतरच टप्प्याटप्प्याने उर्वरित निधी प्राप्त होईल.२० टक्क्यांची अट रद्द होईल का?- विकास कामांसाठी प्राप्त एकूण निधीच्या रकमेत मनपा प्रशासनाला २० टक्के रक्कम जमा करावी लागेल. - मनपाची आर्थिक परिस्थिती पाहता ही अट रद्द होणे गरजेचे आहे. त्यासाठी शासन स्तरावर सत्ताधारी काय प्रयत्न करतात, याकडे लक्ष लागले आहे.नवीन प्रभागात मूलभूत सुविधा निर्माण करण्याचे आमचे लक्ष्य आहे. कामे करताना सर्वप्रथम जलवाहिनीचे जाळे, नाल्या, सर्व्हिस लाइन, पथदिवे आणि त्यानंतर रस्ते असा प्राधान्यक्रम राहील. २० टक्के अटीच्या मुद्यावर शासनासोबत चर्चा सुरू आहे. - विजय अग्रवाल, महापौरनवीन प्रभागात मूलभूत सुविधांचा अभाव असून, मनपाच्या स्तरावर सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न प्रामाणिकपणे सुरू आहेत. निधी मंजूर होण्यापूर्वी विकास कामांचा प्राधान्यक्रम ठरविण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. - अजय लहाने, आयुक्त, मनपा