शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
6
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
7
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
8
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
9
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
10
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
11
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
12
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
13
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
14
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
15
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
16
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
17
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
18
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
19
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...

बाळापूर तालुक्यातील १७ हजार ४४२ शेतकरी दुष्काळी अनुदानापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 16:05 IST

तालुक्यातील सात मंडळांतर्गत ४१ हजार ५३३ शेतकरी खातेदार आहेत. यापैकी २४ हजार ०९२ शेतकºयांच्या खात्यात अनुदान जमा झाले आहे.

- अनंत वानखडे  लोकमत न्यूज नेटवर्कबाळापूर: अल्प पाऊस, खरिपाच्या उत्पादनात मोठी घट, आणेवारी कमी आल्याने शासनाने अकोला जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केला आहे, तसेच दुष्काळी उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेतला. यामध्ये शेतकऱ्यांना दुष्काळी मदत थेट खात्यात देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. बाळापूर तालुक्यातील अर्धे शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत.अल्प पाऊस, खरीप पिकांच्या उत्पादनात घट आल्याने शासनाने बाळापूर तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केला. दुष्काळी उपाययोजनांसह प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये हेक्टरी मदत देण्यात येत आहे. तालुक्यातील सात मंडळांतर्गत ४१ हजार ५३३ शेतकरी खातेदार आहेत. यापैकी २४ हजार ०९२ शेतकºयांच्या खात्यात अनुदान जमा झाले आहे. तालुक्यातील १७ हजार ४४२ शेतकºयांना अजूनही अनुदाची प्रतीक्षा आहे. एकापेक्षा जास्त खातेदार म्हणून सात-बारावर नावे आहेत, अशा इतर खातेदारांच्या खात्यात बँकांनी निधी न देण्याचे पत्र तहसीलदारांना दिले आहे. याबाबत अनेक खातेदारांमध्ये वारसाबाबत वाद आहेत. काही बाहेरगावी असल्याने त्यांचे खाते क्रमांक नसल्याने कोट्यवधींचा शासन निधी कॅनरा बँकेत पडून आहे. खातेदार दररोज तहसील कार्यालय, तलाठी कार्यालय, बँकांमध्ये चकरा मारत आहेत. तलाठ्यांनी शेतकºयांचे अपडेट खाते क्रमांकाची यादी तहसील कार्यालयाला दिली. याच यादीवर बँकनिहाय शेतकरी खातेदारांची खाते क्रमांकाची यादीसह निधी रक्कम खातेदाराच्या खात्यात जमा करण्यासाठी कॅनरा बँकेचे धनादेश संबंधित बँकांना दिले.संबंधित बँकांनी खातेदारांच्या क्रमांक व इतर वारसाबाबतचे तहसीलदारांचे प्रमाणपत्र मागणी न करता अनेक धनादेश तहसील कार्यालयाला परत केले. बँका खातेदारांना योग्य माहिती देत नसल्याने खातेदार भरउन्हात तलाठ्यांकडे, तहसील व बँकेमध्ये चकरा मारत आहेत. २४ हजार खातेदारांचे खाते क्रमांक व सात-बारा इतरांची नसलेली नावे नसल्याने त्यांच्या खात्यात अनुदान जमा झाले; मात्र ५० टक्के शेतकरी अजूनही अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. ५० टक्के निधीसाठी ७ कोटी ४० लाख ०५६६ रुपये निधीची आवश्यकता आहे. आतापर्यंत २८ कोटी ०१ लाख ३७ हजार ६६८ रुपयांचा निधी प्राप्त झालेला आहे. शेतकºयांच्या खात्यात पैसा वळती करण्यासाठी बँकांना कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता होत नाही, तोपर्यंत शासन निधी बँकेत पडून राहणार आहे.

शेतक ºयांनी आपले बँक खाते क्रमांक संबंधित तलाठी यांच्याकडे द्यावे. सात-बारावर इतर खातेदारांनी एका खात्यात पैसे देण्यासाठी अधिकार पत्र दिल्यास अनेक खातेदारांच्या बँक खात्यात वळती करण्याचे पत्र देऊ.- पुरुषोत्तम भुसारी, तहसीलदार, बाळापूर.

टॅग्स :AkolaअकोलाBalapurबाळापूरFarmerशेतकरीdroughtदुष्काळ