शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

बाळापूर तालुक्यातील १७ हजार ४४२ शेतकरी दुष्काळी अनुदानापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 16:05 IST

तालुक्यातील सात मंडळांतर्गत ४१ हजार ५३३ शेतकरी खातेदार आहेत. यापैकी २४ हजार ०९२ शेतकºयांच्या खात्यात अनुदान जमा झाले आहे.

- अनंत वानखडे  लोकमत न्यूज नेटवर्कबाळापूर: अल्प पाऊस, खरिपाच्या उत्पादनात मोठी घट, आणेवारी कमी आल्याने शासनाने अकोला जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केला आहे, तसेच दुष्काळी उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेतला. यामध्ये शेतकऱ्यांना दुष्काळी मदत थेट खात्यात देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. बाळापूर तालुक्यातील अर्धे शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत.अल्प पाऊस, खरीप पिकांच्या उत्पादनात घट आल्याने शासनाने बाळापूर तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केला. दुष्काळी उपाययोजनांसह प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये हेक्टरी मदत देण्यात येत आहे. तालुक्यातील सात मंडळांतर्गत ४१ हजार ५३३ शेतकरी खातेदार आहेत. यापैकी २४ हजार ०९२ शेतकºयांच्या खात्यात अनुदान जमा झाले आहे. तालुक्यातील १७ हजार ४४२ शेतकºयांना अजूनही अनुदाची प्रतीक्षा आहे. एकापेक्षा जास्त खातेदार म्हणून सात-बारावर नावे आहेत, अशा इतर खातेदारांच्या खात्यात बँकांनी निधी न देण्याचे पत्र तहसीलदारांना दिले आहे. याबाबत अनेक खातेदारांमध्ये वारसाबाबत वाद आहेत. काही बाहेरगावी असल्याने त्यांचे खाते क्रमांक नसल्याने कोट्यवधींचा शासन निधी कॅनरा बँकेत पडून आहे. खातेदार दररोज तहसील कार्यालय, तलाठी कार्यालय, बँकांमध्ये चकरा मारत आहेत. तलाठ्यांनी शेतकºयांचे अपडेट खाते क्रमांकाची यादी तहसील कार्यालयाला दिली. याच यादीवर बँकनिहाय शेतकरी खातेदारांची खाते क्रमांकाची यादीसह निधी रक्कम खातेदाराच्या खात्यात जमा करण्यासाठी कॅनरा बँकेचे धनादेश संबंधित बँकांना दिले.संबंधित बँकांनी खातेदारांच्या क्रमांक व इतर वारसाबाबतचे तहसीलदारांचे प्रमाणपत्र मागणी न करता अनेक धनादेश तहसील कार्यालयाला परत केले. बँका खातेदारांना योग्य माहिती देत नसल्याने खातेदार भरउन्हात तलाठ्यांकडे, तहसील व बँकेमध्ये चकरा मारत आहेत. २४ हजार खातेदारांचे खाते क्रमांक व सात-बारा इतरांची नसलेली नावे नसल्याने त्यांच्या खात्यात अनुदान जमा झाले; मात्र ५० टक्के शेतकरी अजूनही अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. ५० टक्के निधीसाठी ७ कोटी ४० लाख ०५६६ रुपये निधीची आवश्यकता आहे. आतापर्यंत २८ कोटी ०१ लाख ३७ हजार ६६८ रुपयांचा निधी प्राप्त झालेला आहे. शेतकºयांच्या खात्यात पैसा वळती करण्यासाठी बँकांना कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता होत नाही, तोपर्यंत शासन निधी बँकेत पडून राहणार आहे.

शेतक ºयांनी आपले बँक खाते क्रमांक संबंधित तलाठी यांच्याकडे द्यावे. सात-बारावर इतर खातेदारांनी एका खात्यात पैसे देण्यासाठी अधिकार पत्र दिल्यास अनेक खातेदारांच्या बँक खात्यात वळती करण्याचे पत्र देऊ.- पुरुषोत्तम भुसारी, तहसीलदार, बाळापूर.

टॅग्स :AkolaअकोलाBalapurबाळापूरFarmerशेतकरीdroughtदुष्काळ