शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

१६ जणांना भारताचे नागरिकत्व; भाजप नेते किरीट साेमय्यांनी दिले पुरावे

By आशीष गावंडे | Updated: February 6, 2025 21:46 IST

बनावट जन्म दाखले सादर करणाऱ्या १३ जणांविराेधात रामदासपेठ पाेलिसांत गुन्हा दाखल

अकाेला: बांगलादेशी नागरिक घुसखोरीच्या मुद्यावरुन भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गुरुवारी रामदासपेठ पाेलिस ठाण्यात १६ जणांची यादी पुराव्यासहित सादर केली. जिल्ह्यात विविध भागात वास्तव्य करणाऱ्या ८० जणांनी गैरमार्गाने जन्म दाखला मिळवून भारताचे नागरिकत्व मिळविल्याचा दावा साेमय्या यांनी यावेळी केला. याप्रकरणी किरीट सोमय्या यांचे बयाण नोंदविण्यात आले. दरम्यान, नायब तहसिलदार यांच्या तक्रारीवरुन बनावट जन्म दाखले सादर करणाऱ्या १३ जणांविराेधात रामदासपेठ पाेलिसांत गुन्हा दाखल करुन तीन जणांना अटक केली आहे.

जन्म व मृत्यू नाेंदणी कायद्यातील सुधारणेनंतर अकाेला जिल्ह्यात उशिरा जन्म प्रमाणपत्रासाठी प्राप्त झालेल्या अर्जांवर भाजप नेते किरीट साेमय्या यांनी आक्षेप घेतला आहे. लाेकसभा निवडणुकीनंतर जन्म व जात प्रमाणपत्रासाठी प्राप्त झालेल्या अर्जांतील नावे बांग्लादेशी व्यक्तींची असल्याचा आराेप साेमय्या यांनी केला आहे. दरम्यान, याप्रकरणी साेमय्या यांनी तक्रार दिली असल्यामुळे बयाण नाेंदविण्यासाठी ते रामदासपेठ पाेलिस ठाण्यात हजर झाले हाेते. यावेळी त्यांनी १६ जणांची यादी पुराव्यासहित शहर पाेलिस उपअधीक्षक सतीष कुलकर्णी,रामदासपेठचे पाेलिस निरीक्षक मनाेज बहुरे यांच्याकडे सादर केली. याप्रकरणी लवकरच फॉरेन्सिक ऑडिटर नेमण्याचा अधिकार पोलिसांना मिळणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.

१३ जणांविराेधात गुन्हे दाखल

अकाेला तहसिलच्या नायब तहसिलदार स्वप्नाली काळे यांनी जन्म तारखेत खाेडताेड करुन प्रमाणपत्र मिळविणाऱ्या १२ जणांविराेधात रामदासपेठ पाेलिस ठाण्यात तक्रार नाेंदवली. याप्रकरणी पाेलिसांनी बीएनएस ३१८(४),३३६(२),३३७, ३३६(३),३४०(२),३(५) अन्वये गुन्हा दाखल केला. तसेच मेहबूब खान नाजूल्ला खान, माेहम्मद जुबेर माे.युनूस, अब्दुल जुनेद पटेल अब्दुल बहार पटेल यांना अटक केली. १३ व्या आराेपीचे नाव पाेलिस तपासात निष्पन्न झाल्याची माहिती आहे. 

प्रशासकिय अधिकारी रडारवर

याप्रकरणात सामील असलेल्या तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सुद्धा कारवाई होणार असा, इशारा भाजप नेते साेमय्या यांनी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शाळेतील नोंदी तपासण्याचे काम सुरू झाले आहे. तहसीदारांच्या संमतीशिवाय बनावट दाखले तयार हाेऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांना पाठीशी घालणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कारवाई होणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी याेग्य काम न केल्यास त्यांनाही सोडणार नाही, असा इशारा सोमय्या यांनी दिला.

टॅग्स :AkolaअकोलाKirit Somaiyaकिरीट सोमय्याBJPभाजपा