१२ कोटींच्या योजना बारगळल्या
By Admin | Updated: April 3, 2017 02:34 IST2017-04-03T02:34:08+5:302017-04-03T02:34:08+5:30
जिल्हा परिषद सेस फंडातील कृषी, समाजकल्याण व महिला-बालकल्याण विभागाच्या योजनांचा १२ कोटी ९५ लाख रुपयांचा निधी अखर्चित राहिल्यात.

१२ कोटींच्या योजना बारगळल्या
अकोला, दि. २- जिल्हा परिषद सेस फंडातील कृषी, समाजकल्याण व महिला-बालकल्याण विभागाच्या योजनांचा १२ कोटी ९५ लाख रुपयांचा निधी अखर्चित राहिल्याने, जिल्हा परिषदेच्या कारभारात अडकलेल्या विविध योजना अखेर ह्यमार्च एन्डह्णमध्ये बारगळल्या. जिल्हा परिषद सेस फंडातून विविध योजना राबविल्या जातात. त्यामध्ये प्रामुख्याने, समाजकल्याण, कृषी आणि महिला व बालकल्याण विभागाच्या योजनांचा समावेश आहे. सन २0१६-१७ या वर्षात समाजकल्याण, महिला व बालकल्याण आणि कृषी विभागामार्फत विविध योजना राबविण्यासाठी सेस फंडातून निधीची तरतूद करण्यात आली. निधी उपलब्ध असताना गत वर्षभराच्या कालावधीत जिल्हा परिषदेच्या कारभारात योजना मार्गी लागल्या लागू शकल्या नाही. समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणार्या योजनांचा ४ कोटी ६१ लाख रुपये, महिला व बालकल्याण विभागाच्या योजनांचा ४.८४ लाख रुपये आणि कृषी विभागाच्या योजनांचा ३ कोटी ५0 लाख रुपयांचा निधी ३१ मार्चपर्यंंंंत खर्च होऊ शकला नाही. निधी अखर्चित राहिल्याने जिल्हा परिषद सेस फंडातील १२ कोटी ९५ लाख रुपयांच्या योजना अखेर सन २0१६-१७ या वर्षात बारगळल्या आहेत. बारगळलेल्या या योजना सन २0१७-१८ या वर्षात मार्गी लागणार आहेत.मार्च अखेरपर्यंंंंत योजना मार्गी लागल्या नसल्याने, जिल्हा परिषदेच्या योजनांच्या लाभापासून जिल्हय़ातील लाभार्थींना वंचित राहावे लागले आहे.