शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

युवा शेतकऱ्याने माळरानावर शेती करून सुगंधी तेलाचे केले यशस्वी उत्पादन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 12:20 PM

यशकथा : सुरुवातीला मुळा नदीच्या काठावरील बरड माळरान व्यापारी तत्त्वावर विकसित केली.

- हेमंत आवारी (अहमदनगर) 

शाळेत असताना ‘ऊर्ध्वपातन’ म्हणजे द्रवाचे बाष्पात आणि बाष्पाचे पुन्हा द्रवात रूपांतर ही रासायनिक प्रक्रिया मनात पक्के घर करून होतीच. या ज्ञानाच्या शिदोरीवर रसायनशास्त्रातून पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या आंभोळ (ता. अकोले) येथील मच्छिंद्र चौधरी या युवकाने सुगंधी वनस्पतीची शेती ‘अ‍ॅरोमॅटिक फार्मिंग’ करण्याचा निर्णय घेतला.

अकोले तालुक्यातील आदिवासी क्षेत्रालगत मुळा नदीच्या काठावरील पठार बरड माळरानावर त्याने पारंपरिक शेती शेततळ्याच्या व ठिबक सिंचनाच्या माध्यमातून व्यापारी तत्त्वावर विकसित केली. सात एकर शेतात जिरॅनिअम, चार एकर क्षेत्रावर ‘वाळा’ (व्हेटिव्हर) आणि काही क्षेत्रात ‘गवती चहा’ (सिड्रोल्ना) तसेच दीड एकरमध्ये ‘पालमुरजा’ (सुराड्यासारखे गवत) ची लागवड केली. चारही वनस्पतींपासून सुगंधी तेल उत्पादित होते. या वनस्पतींचा उपयोग ‘सौंदर्य प्रसाधने’ (कॉस्मॅटिक) तयार करण्यासाठी केला जात असल्याने उत्पादनास मागणी आहे. जिरॅनिअमच्या शेतात आंतरपीक म्हणून ‘शेवगा’ लागवड केली आहे.

दोन वर्षांपूर्वी २५ रुपयांप्रमाणे जिरॅनिअमची रोपे लखनौ येथून आणली. चार फुटी सरी तयार करून शेणखताच्या बेडवर सव्वा फूट अंतरावर लागवड केली. पिकांवर शेंडअळी, मावा, तुडतुड्यांचा प्रादुर्भाव नाही. लागवडीच्या वेळी सुपरफॉस्पेट व महाधन टाकले. नत्रासाठी गोमूत्राची फवारणी केली. सुरुवातीला एकरी एक लिटरप्रमाणे हुमीक अ‍ॅसिड व सात किलो युरिया वर खताबरोबर वापरला. पाच-सहा वेळा झिंक सल्फेट बुरशीनाशकाची फवारणी केली. साधारण एप्रिल, मेमध्ये केलेली लागवड फायदेशीर ठरते. चार महिन्यांत पीक कापणीला येते. तीन इंच फुटवा सोडून कापणी करावी. वर्षातून तीन वेळा कापणी होते. कमी पाण्यावरचे हे पीक आहे. वापसा पाहून ठिबकने पाणी दिले. एका कापणीला एकरी दहा टन उत्पादन मिळाले.

साधारण लाखभर रुपये खर्च करून शेतातच त्यांनी ‘ऊर्ध्वपातन’ प्रकल्प उभारला आहे. १ टन गवताला ३५० किलो लाकूड जळणासाठी लागते. चार रोजंदार माणसे दिवसभरात हे काम करू शकतात. १ टनाला साधारण ९०० मिली ते १ लिटर तेल मिळते. साधारणपणे साडेबारा हजार रुपये लिटर तेलास भाव आहे. वर्षात एकरी ३० लिटर तेल मिळाले. त्यातून एकरी साडेतीन लाख रुपये मिळाले असून, दीड लाख रुपये खर्च वजा जाता एकरी दोन लाख रुपये उत्पन्न मिळाल्याचे येथील कामगार प्रकाश भोर यांनी सांगितले. 

दोन वर्षात आतापर्यंत अंदाजे अडीचशे ते तीनशे लिटर तेल उत्पादन झाले आहे. आता पाच-दहा लाख रुपये खर्च करून अत्याधुनिक बॉयलर व ऊर्ध्वपातन यंत्रणा बसविण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. जिरॅनिअमच्या ४० हजार व ३० हजार अशा दोन रोपांच्या रोपवाटिका तयार केल्या असून, आठ रुपयांना एक रोप विकले जाते. शेती पाहण्यासाठी शेतकरी दररोज येतात. येत्या २६ डिसेंबरला अमरावती कृषी विद्यापीठात जाऊन मच्छिंद्र चौधरी हे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. 

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी