शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

खासदार बोलणारा हवा की न बोलणारा : सुजय विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 12:02 PM

लोकसभेची निवडणूक ही पक्षाची असली तरी, उमेदवारांची तुलना करण्याची संधी मतदारांसमोर आहे. संसदेमध्ये आपले प्रश्न कोण मांडतो याला महत्व आहे.

अहमदनगर : लोकसभेची निवडणूक ही पक्षाची असली तरी, उमेदवारांची तुलना करण्याची संधी मतदारांसमोर आहे. संसदेमध्ये आपले प्रश्न कोण मांडतो याला महत्व आहे. मी घरातला की बाहेरचा या चर्चेला महत्व देण्यापेक्षा लोकांसाठी उपलब्ध होऊन, अभ्यास करुन प्रश्न सोडविणारा खासदार तुम्हाला हवा की, साडेचार वर्षात विधानसभेत फक्त दोन मिनिटे बोलणारा हवा याचा विचार करा, असे आवाहन महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.नगर तालुक्यातील भोरवाडी, चास, सोनेवाडी, कामरवाडी, सारोळा कासार आणि अकोळनेर येथे त्यांनी मतदारांच्या भेटीगाठी घेऊन संवाद साधला. निवडणुकीतील भूमिका मतदारांसमोर मांडताना त्यांनी तालुक्यातील आणि मतदार संघातील विविध प्रश्नांवर भाष्य केले. प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी लोकसभेत अभ्यासूपणे प्रश्न मांडणारा खासदार पाठविणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे यांनीही दक्षिणेचे नेतृत्व करताना जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले. मात्र त्यांना काम करण्यासाठी कमी कालावधी मिळाला. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही निवडणूक आहे. उत्तरेचे अतिक्रमण म्हणून आमच्यावर निरर्थक टीका केली जाते. पण अतिक्रमण करण्याची सवय कोणाची आहे? हे नगरकर चांगलेच जाणून आहेत. गुणे आयुर्वेद महाविद्यालयाचा इतिहास सर्वांच्या समोर आहे. या महाविद्यालयावर कोणी कसे अतिक्रमण केले हे जनता विसरलेली नाही. एक काळ आयुर्वेद महाविद्यालयाचा संपूर्ण राज्यात नावलौकिक होता. आज अवस्था काय आहे? एका राजकीय पक्षाचे कार्यालय म्हणून ते ओळखले जात असल्याची टीका विखे यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलमंत्रालय स्थापन करण्याची घोषणा केली. याप्रसंगी रामदास भोर, संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, अरुण होळकर, राजेंद्र भगत, बाळासाहेब पोटघन आदी याप्रसंगी उपस्थित होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar-pcअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019