विरोधक काय दिवा लावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:18 AM2021-01-14T04:18:42+5:302021-01-14T04:18:42+5:30
पाटील म्हणाले, सत्तेच्या माध्यमातून गावात मोठ्या प्रमाणावर कामे केली. भविष्यात विविध रस्त्यांची कामे, पिण्याचे पाणी आदी भौतिक सुविधांसह ग्रामपंचायत ...
पाटील म्हणाले, सत्तेच्या माध्यमातून गावात मोठ्या प्रमाणावर कामे केली. भविष्यात विविध रस्त्यांची कामे, पिण्याचे पाणी आदी भौतिक सुविधांसह ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान, क्रीडा संकुल उभारण्याचा मानस आहे. गावातील शांतता व शिस्त कायम ठेवण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. ती तशीच ठेवण्याचे काम आपल्या हातात आहे. अनेक बेरोजगारांना व्यवसाय निर्माण करून देण्यासाठी जागा दिली. भविष्यात याबाबत आणखी ध्येयधोरणे राबविण्याचा मानस असल्याचे मत डॉ. तनपुरे कारखान्याचे माजी अध्यक्ष उदयसिंह पाटील यांनी व्यक्त केले.
सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा सहकारी बँकेचे माजी संचालक दत्तात्रय गडाख होते. दरम्यान, सुखदेव कुसमुडे, तात्यासाहेब डोळसे, रंगनाथ गवते, ऋषिकेश गडाख, ढोकणे गुरुजी, आदित्य मुनोत, साठे आदींची भाषणे झाली. यावेळी ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष भानुदास कुसमुडे, रामा धनवटे, युनूस शेख, सादिक कोतवाल, फिरोज शेख, सूरज मकासरे, दिलीप ससाणे, अशोक तुपे, देवीदास जवरे, रामभाऊ बोरकर उपस्थित होते. सूत्रसंचालन डी. के. मोरे यांनी केले. आभार परेश व्यास यांनी मानले.