शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

११ लाख ग्रामस्थांची तहान टँकरवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 1:30 PM

एकीकडे गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना दुसरीकडे ग्रामीण भागात हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांची धडपड सुरू आहे.

अहमदनगर : एकीकडे गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना दुसरीकडे ग्रामीण भागात हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांची धडपड सुरू आहे. सद्यस्थितीत टँकरने आत्तापर्यंतचा उच्चांक गाठला असून तब्बल ७३२ टँकरने ११ लाखांहून अधिक लोकांना पाणीपुरवठा केला जात आहे.यंदाच्या तीव्र दुष्काळात सर्वांचीच लाहीलाही होत असून पाणीटंचाईने नागरिक घायाळ झाले आहेत. भूजलपातळी खालावल्याने गावोगावच्या विहिरी, कूपनलिका कोरड्या पडल्या. पाणी योजनाही बंद पडल्याने पाण्यासाठी भटकंती सुरू झाली.त्यामुळे जिल्हा प्रशासनाने जानेवारीपासून टँकर सुरू केले.आजमितीस ४८३ गावे व २ हजार ७२२ वाड्यांमधील सुमारे ११ लाख २६ हजार लोकसंख्येला तब्बल ७३२ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. २०१३च्या दुष्काळी स्थितीत टँकरचा आकडा ७३२ होता. तो आकडाही आता मागे पडला आहे. अजून मे व जून असे दोन महिने जायचे आहेत. त्यामुळे टँकरचा आकडा हजारापर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.माणसी २० लिटर पाणी टँकरद्वारे दिले जाते. तेच पाणी जपून वापरण्याचे आव्हान लोकांपुढे आहे. सुदैवाने जनावरांच्या छावण्या सुरू आहेत. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न मिटला आहे. दुसरीकडे सूर्य आग ओकत असताना पाण्याची मागणी वाढली आहे. प्रशासनाने आणखी खेपा वाढवून द्याव्यात, अशी मागणीही होत आहे.सर्वाधिक १५२ टँकर पाथर्डी तालुक्यात सुरू असून त्यानंतर पारनेर (१३७), शेवगाव (५९), संगमनेर (५३) येथेही टँकरची संख्या अधिक आहे.तालुकानिहाय टँकरची संख्यासंगमनेर 53अकोले 6कोपरगाव 10राहुरी 1नेवासा 26राहाता 4नगर 58पारनेर 137पाथर्डी 152शेवगाव 59कर्जत 91जामखेड 89श्रीगोंदा 46

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय