शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
5
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
9
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
10
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
11
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
12
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
13
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
14
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
15
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
16
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
17
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
18
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
19
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
20
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका

पाठ्यपुस्तकात साहित्यमुल्य असणारेच पाठ हवेत - मुथा

By साहेबराव नरसाळे | Published: June 09, 2019 1:24 PM

ज्येष्ठ साहित्यिक प्रा़ जवाहर मुथा यांच्याशी ‘मराठी वाचवा’ या लोकमतच्या अभियानाप्रसंगी साधलेला संवाद़़

साहेबराव नरसाळेअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष पदाची तीन वेळा निवडणूक लढविलेले आणि कथा, कादंबरी, संशोधन, कृषी, पर्यटन अशा विविध विषयांवर ३५ पुस्तके लिहिलेल्या ज्येष्ठ साहित्यिक प्रा़ जवाहर मुथा यांच्याशी ‘मराठी वाचवा’ या लोकमतच्या अभियानाप्रसंगी साधलेला संवाद़़मराठी भाषेचे अध:पतन होतेय का?मराठी भाषेचे अध:पतन होतेय, हे खरे आहे़ कारण त्याला महाराष्ट्र शासनाचे धोरण कारणीभूत आहे़ त्याशिवाय मराठी भाषेविषयी अनास्था असलेले लोकं मराठी भाषेविषयी चुकीचे निर्णय घेत आहेत़ याचे एक उदाहरण मी येथे सांगतो, ‘मी जेव्हा राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात मराठी शिकवीत होतो, तेव्हा १९७३-७४ साली त्याठिकाणी मराठी भाषा शिकविणे बंद झाले होते. त्यानंतर मी त्यावेळचे मुख्यमंत्री शरद पवार व मराठी विकास परिषद यांना पत्र लिहून मराठी भाषेवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडली होती़ मराठी शिकविणे बंद करुन चालणार नाही, अशी रोकठोक भूमिका मी मांडली होती़ मराठी भाषा जर शिकवली गेली नाही तर शेतकऱ्यांच्या मुलांना अर्ज कसा करावा, हे सुद्धा माहिती पडणार नाही. मराठी भाषेचे अस्तित्व दिवसेंदिवस कमी होत आहे, ही गोष्ट खरी आहे. त्यामुळे मराठी भाषा टिकली पाहिजे़ त्यासाठी महाराष्ट्राने मराठी आमची अस्मिता अशी चळवळच उभी करुन सर्व ठिकाणी मराठी सक्तीची करायला हवी़पाठ्यपुस्तकांमधील मराठी साहित्यही मराठीच्या अध:पतनास कारणीभूत ठरतेय का?आज पाठ्यपुस्तकांची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे़ मराठी भाषा टिकवायची असेल तर पाठ्यपुस्तकांमधील साहित्य हे सहज, सुंदर आणि ओघवते असायला हवे़ त्याला ठसठसीत साहित्यमूल्य असावे़ दुर्दैवाने पाठ्यपुस्तकांमध्ये असलेल्याकविता, किंवा पाठ यांच्यामध्ये मराठी वाड:मयाच्या दृष्टिने काहीही मुल्य उरलेले दिसत नाही़महाराष्ट्रात मराठीची सक्ती असावी का?प्रश्नच नाही़ तरच मराठी टिकेल. प्रत्येक शाळेमध्ये मराठी हा विषय अपरिहार्य, सक्तीचा करणे अत्यंत आवश्यक आहे़ कारण पुढील काळात मराठी प्रमाण भाषेला अत्यंत महत्त्वाचे स्थान मिळणार आहे. त्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये, मग ती इंग्रजी माध्यमाची असो किंवा उर्दू माध्यमाची असो, मराठी विषय सक्तीचाच असावा, असे माझे स्पष्ट मत आहे़ दाक्षिणात्य राज्यांमध्ये ते होऊ शकते, उत्तरेकडील राज्य हिंदीची सक्तीची करतात तर महाराष्ट्राची मातृभाषा आणि महाराष्ट्राचा गौरव असलेली मराठी सक्तीची का नको?दर्जाहीन व प्रमाणभाषेचा अभाव असलेल्या साहित्यांची पाठ्यपुस्तकांमध्ये रेलचेल दिसते़ हे फार दुर्दैवाचे आहे़ मराठी भाषा विकास समितीने त्यासंबंधी निर्णय घेतले पाहिजे. मराठी भाषा टिकवायची असेल तर सहज सुंदर आणि प्रमाणभाषेतील साहित्य पाठ्यपुस्तकांमध्ये असायला हवे़ आज पाठ्यपुस्तकांमधील साहित्याचा दर्जा घसरला आहे़ त्याला निर्णय प्रक्रियेतील उदासिनता जबाबदार आहे़ - प्रा़ जवाहर मुथा, ज्येष्ठ साहित्यिक

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर