शहरं
Join us  
Trending Stories
1
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; उपराज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
2
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
3
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
4
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
5
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
6
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
7
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
8
मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो
9
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
10
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
11
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
12
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
13
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
14
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
15
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
16
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
17
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
18
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
19
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
20
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"

तनपुरे साखर कारखाना पुन्हा व्हेन्टिलेटरवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 2:44 PM

राहुरी येथील डॉ़ बा़ बा़ तनपुरे सहकारी साखर कारखाना यंदा पुन्हा व्हॅन्टिलेटरवर आहे. दोन गळीत हंगामानंतर आर्थिक संकटात सापडलेला कारखाना माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्याकडून खासदार डॉ़ सुजय विखे यांच्या ताब्यात आला. विखे यांनी शर्थीचे प्रयत्न करून दोन वर्षांपूर्वी कारखाना सुरू केला. मात्र यंदा राहुरी तालुक्यात ऊस नसल्याने कारखाना बंद ठेवावा लागला आहे.

भाऊसाहेब येवले ।  राहुरी : महाराष्ट्रात ऐके काळी दबदबा असलेला राहुरी येथील डॉ. बा. बा. तनपुरे सहकारी साखर कारखाना यंदा पुन्हा व्हॅन्टिलेटरवर आहे. दोन गळीत हंगामानंतर आर्थिक संकटात सापडलेला कारखाना माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्याकडून खासदार डॉ. सुजय विखे यांच्या ताब्यात आला. विखे यांनी शर्थीचे प्रयत्न करून दोन वर्षांपूर्वी कारखाना सुरू केला. मात्र यंदा राहुरी तालुक्यात ऊस नसल्याने कारखाना बंद ठेवावा लागला आहे. त्यामुळे राहुरीचे आर्थिकचक्र अडचणीत आले आहे.तत्कालीन अध्यक्ष रामदास पाटील धुमाळ यांनी २१०५ रूपये प्रतिटन उचांकी भाव देऊन स्पर्धा निर्माण केली होती. तनपुरे कारखान्यावर कर्जाचा बोजा वाढत असताना सत्तांतर घडून आले. माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या ताब्यात कारखान्याची सूत्रे आली. मात्र कर्जाचे ओझे न पेलावल्याने तीन गळीत हंगामानंतर कारखाना बंद पडला. त्यामुळे तनपुरे यांनी नजिकच्या काळात मोठी राजकीय किंमत मोजावी लागली. विखे यांच्या ताब्यात कारखाना आला. अनेक अडचणींवर मात करीत विखे यांनी कारखान्याचे चाक फिरविण्यात यश संपादन केले. मात्र यावर्षी तनपुरे कारखाना बंद राहिल्याने ऊस उत्पादक व कारखान्याचे कामगार यांच्यामध्ये कमालीची नाराजी उफाळून आली आहे. विखे यांनी खासदारकीची घोषणा ज्या तनपुरे कारखान्यावर केली होती. तिथेच नाराजी वाढली. १७ डिसेंबर रोजी कामगार आमरण उपोषण करणार आहेत. ऊस नसल्याने कारखाना बंद ठेवावा लागला आहे. विखे यांच्या ताब्यात सत्ता आल्यानंतर कामगारांचे साडेसतरा कोटी रूपये पगार व प्रॉव्हिडंड फंड देणे आहे. त्यापूर्वीचे ९० कोटी रूपये कामगारांचे देणे आहे. ऊस उत्पादकांचे थकीत देणे संचालक मंडळाने दिले. तनपुरे कारखान्यावर कामगार, शासकीय देणे व बँके चे कर्ज मिळून साडेतीनशे कोटी रूपयांपेक्षा अधिक रक्कम देणे आहे. तनपुरे कारखान्यावरील वीज व पाणी पुरवठा बंद आहे.पुढील वर्षावर भिस्त़यंदा राहुरी तालुक्यात उसाच्या लागवडीला सुरूवात झाली आहे. मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. त्यामुळे पुढील वर्षी पुरेशा प्रमाणावर ऊस उपलब्ध होणार आहे. त्याग करणारा छोटा शेतकरी सदैव राहुरी कारखान्याचा कैवारी ठरला आहे. त्यामुळे शेतकरी ऊस देईल़ याशिवाय कामगारही मदतीचा हात देऊ शकतात. पुढील वर्षी संचालक मंडळाने नियोजन केले तर तनपुरे कारखाना यशस्वीपणे गळीत हंगाम करून शकतो.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेAhmednagarअहमदनगर