शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

राज्यात यंदा ८ लाख हेक्टरवर ऊस शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 12:30 PM

यंदा महाराष्ट्रात ८ लाख २२ हजार हेक्टरवर ऊस शिल्लक आहे़ या उसाच्या गाळपासाठी राज्यातील १६१ साखर कारखान्यांनी परवान्यासाठी आॅनलाईन प्रस्ताव पाठविले आहेत.

भाऊसाहेब येवले ।  राहुरी : यंदा महाराष्ट्रात ८ लाख २२ हजार हेक्टरवर ऊस शिल्लक आहे. या उसाच्या गाळपासाठी राज्यातील १६१ साखर कारखान्यांनी परवान्यासाठी आॅनलाईन प्रस्ताव पाठविले आहेत. यंदा फक्त ५१८ लाख मेट्रिक टन उसाची उपलब्धता होण्याची शक्यता असल्याने ऊस टंचाईचे सावट आहे.गेल्यावर्षी ११ लाख ६२ हजार हेक्टरवर  ९४७ लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध झाला होता. गेल्या वर्षी राज्यात १९५ साखर कारखाने सुरू होते़ यंदा परवाना घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. ऊस उपलब्धता कमी झाल्यास किती कारखाने चालू शकतात. याबाबत शंका आहे़ यंदा चांगला पाऊस पडल्याने या महिन्याअखेर ऊस लागवडीला मोठ्या प्रमाणावर सुरूवात होणार आहे. शेतात पाणी असल्याने ऊस लागवडीला विलंब होत आहे. आगामी दोन वर्षे मोठ्या प्रमाणावर ऊस उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अतिरिक्त साखरेचा प्रश्न कायम राहणार आहे. आवश्यक त्या प्रमाणावर साखर उत्पादन करून इथेनॉल निर्मितीवर भर दिला. तरच साखर कारखाने अडचणीतून बाहेर पडू शकतील अशी परिस्थिती आहे.अहमदनगर जिल्ह्यात २३ साखर कारखाने आहेत. त्यापैकी १६ साखर कारखान्यांनी आॅनलाईन प्रस्ताव परवान्यासाठी  साखर आयुक्त पुणे यांच्याकडे पाठविले आहेत़. जिल्ह्यातील सरासरी ऊस क्षेत्र १ लाख २० हेक्टर आहे. यंदा जिल्ह्यात अंदाजे ७० हजार हेक्टरवर ऊस उपलब्ध होण्याची शक्यता आहे़.यंदा राज्यात कमी ऊस आहे. त्यामुळे सुरु झालेले कारखानेही अल्प कालावधीसाठी चालतील. आतापर्यंत १६१ कारखान्यांनी गाळपासाठी प्रस्ताव दाखल केले आहेत, असे साखर संचालक दत्तात्रय गायकवाड यांनी सांगितले आहे. 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेAhmednagarअहमदनगर