शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

प्रगतीशील शेतकऱ्याची यशकथा; केवळ २० गुंठ्यात हळद लागवड ते पावडर निर्मिती करून कमावले लाखो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2019 12:32 PM

यशकथा : नोकऱ्या दुरापास्त झाल्याने नोकरीच्या मागे न धावता त्यांनी शेतातूनच सोने पिकविण्याचा निर्धार करून शेती करणे सुरू केले.

- यमन पुलाटे ( अहमदनगर) 

प्रगतिशील शेतकरी हे नेहमी आपल्या शेतीमध्ये वेगळे प्रयोग करीत असतात. उसाच्या पट्ट्यात हळद लागवडीचा आगळा-वेगळा प्रयोग अहमदनगर जिल्ह्यातील लोणी, ता. राहाता  येथील शेतकरी संजय सोपान घोगरे यांनी केला. आपल्या शेतीत हळद लागवडीबरोबरच ते थेट हळद पावडर निर्मिती करतात. मार्केटिंग करून हळद पावडर विक्री करून २० गुंठ्यातून लाखोंची कमाई करीत आहेत.

संजय घोगरे हे तसे पदवीधर आहेत. नोकऱ्या दुरापास्त झाल्याने नोकरीच्या मागे न धावता त्यांनी शेतातूनच सोने पिकविण्याचा निर्धार करून शेती करणे सुरू केले. शेतीत राहून काही तरी वेगळे करायचे ही त्यांची जिद्द म्हणून ऊस, हंगामी पिके, चारा पिके, भाजीपाला आदी पिके घेत असताना आपल्या भागात देखील हळद लागवड होऊ शकते याची माहिती बाभळेश्वरच्या कृषी विज्ञान केंद्राकडून मिळाली. मग हळद लागवड करण्याचा निर्णय २००८ मध्ये त्यांनी घेतला. हळद पावडर तयार करण्यासाठी हळदीची चांगली जात त्यांनी निवडली.

सुरुवातीला ११ कंदापासून त्यांनी सुरुवात केली. २०१० मध्ये २० बेणेमळा तयार झाल्यानंतर त्यांनी २० गुंठ्यांवर हळद लागवडीचा निर्णय घेतला. या क्षेत्राची चांगली मशागत करून दोन ते तीन ट्रॅक्टर ट्रॉली शेण खताचा वापर करून सुरुवातीला चांगली मशागत केली. साडेचार फुटावर बेड पद्धत वापरून १४ इंचावर कंद लागवड करताना रासायनिक आणि जिवाणू खतांची बेणे प्रक्रिया केली. यामुळे उगवण चांगली झाली. पुढे कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ पुरुषोत्तम हेंद्रे, शांताराम सोनवणे, भरत दवंगे, सुनील बोरुडे यांच्या मार्गदर्शनाखाली खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन आणि रोग कीड नियंत्रण केले.

सुरुवातीपासून सेंद्रिय खतावर जास्त भर देत गांडूळ खत, निंबोळी पेंड आणि स्लरीबरोबरच वर्मीवॉशचा वापर त्यांनी या पिकासाठी केला. यामुळे खर्च कमी करून २० गुंठ्यांमध्ये २ टन वाळलेल्या हळदीचे उत्पादन घेतले. यामध्ये पत्नी अनिता हिची मोठी साथ मिळाली. तिने एका फाऊंडेशनमार्फत साईश्री महिला बचत गटाची स्थापना केली. मार्केटिंगला या बचत गटाची चांगली मदत झाली.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे पाटील, प्रकल्प संचालिका रुपाली लोंढे यांचेही मार्गदर्शन घोगरे यांना लाभले. दोन टन हळद दरवर्षी निर्मिती करून ती विक्री करण्याचे कसब हे दाम्पत्य करीत आहे. घरगुती पद्धतीने तयार केलेली हळद ते विविध प्रदर्शनात किंवा मोक्याच्या ठिकाणी स्टॉल लावून, मार्केटिंग करतात. त्यांच्या या उपक्रमामुळे बचत गटाच्या महिलांना हक्काचा रोजगार मिळाला आहे. घोगरे यांनी साईसागर हा नवा ब्रॅन्ड विकसित केला आहे. यातून दरवर्षी लाखो रुपयांची कमाई ते करीत आहेत. शेतकऱ्यांनी केवळ पिकाचे उत्पादन घेऊन थांबू नये, तर त्यापासून उत्पादने बनवून ती विक्री करण्याचे कसब आत्मसात केले पाहिजे, मार्केटिंगमध्ये उतरून आपली प्रगती साध्य केली पाहिजे, असे मत संजय घोगरे हे अभिमानाने व्यक्त करतात.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी