शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
2
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
3
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
4
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
5
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
6
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
7
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
8
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
9
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
10
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
11
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
12
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
13
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
14
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
15
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
16
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
17
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
18
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!
19
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!
20
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!

नगर दक्षिणेतून प्रसंगी अपक्ष लढण्याचे सुजय विखेंचे सूचक वक्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 11:15 PM

पक्षाच्या बाहेर जाऊन आपण जनतेच्या कामाला प्राधान्य देतो. ‘जनसेवा’ संघटनेचे कार्यकर्ते प्रसंगी ‘सायकल’ हाती घेऊन जनतेचे काम करतील, असे प्रतिपादन डॉ. सुजय विखे यांनी शुक्रवारी रात्री पाथर्डीत गेले.

पाथर्डी : पक्षाच्या बाहेर जाऊन आपण जनतेच्या कामाला प्राधान्य देतो. ‘जनसेवा’ संघटनेचे कार्यकर्ते प्रसंगी ‘सायकल’ हाती घेऊन जनतेचे काम करतील, असे प्रतिपादन डॉ. सुजय विखे यांनी शुक्रवारी रात्री पाथर्डीत गेले. त्यांच्या या वक्तव्याला माजी खासदार बाळासाहेब विखे यांनी ‘सायकल’ चिन्ह घेऊन अपक्ष लढविलेल्या निवडणुकीचा संदर्भ असल्याचे मानले जात आहे.डॉ. सुजय यांनी पाथर्डीत ‘जनसेवा’ या आपल्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले. त्यानंतर झालेल्या सभेत बोलताना ते म्हणाले, मी कुठल्याही पक्षाचा नाही. मी नेता नसून कार्यकर्ता आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मी मेंदूचा डॉक्टर आहे. पन्नास वर्षाच्या कालावधीत विखे कुटुंबीयांनी स्वच्छ राजकारण व समाजकारण केले. आमच्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही.जनतेसाठी कुठलीही तडजोड आम्ही करत नाही. पाथर्डीच्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादीने सातत्याने चुका केल्या. भाजपा सदैव चुकत आहे, तर सेना सुधारायला तयारच नाही. त्यामुळे जनता वाºयावर आहे. मी पक्ष न पाहता जनसेवा कार्यालयाच्या माध्यमातून काम करणार आहे. जनसेवेचे कार्यकर्ते जनतेसाठी ‘सायकल’ देखील हाती घेतील, असे ते म्हणाले.१९९१ साली बाळासाहेब विखे यांनी ‘सायकल’ चिन्ह घेऊन नगर दक्षिणेतून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यामुळे सुजय यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय क्षेत्राच्या भुवया उंचावल्या आहेत. यावेळी अरुण आठरे, मोहन पालवे, भाऊसाहेब राजळे, काशीनाथ लवाडे, संभाजी वाघ, गहिनीनाथ थोरे, नासीर शेख, सहदेव शिरसाठ,शंकरराव पालवे, बंडूशेठ बोरुडे, अजय रक्ताटे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजय रक्ताटे यांनी तर आभार बंडूशेट बोरुडे यांनी मानले.

विखेंकडून बदलाचे सूचक विधान

डॉ. सुजय विखे यांचे भाषण सुरु होताच खाली बसलेल्या कार्यकर्त्याने हाताचा पंजा... पंजा असे ओरडून सांगितले. त्यावेळी सुजय विखे यांनी थोडा बदल आहे, असे व्यासपीठावरून सूचक विधान केले. त्यावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

पक्षापेक्षा जनतेला महत्त्व

नगर तालुक्यात चिचोंडी पाटील येथेही विखे यांचा मेळावा झाला. तेथील सभेत विखे यांनी भाजप व कॉंग्रेसकडून लोकसभा लढवावी, अशी मागणी आपल्या भाषणात अनुक्रमे भाजपचे मनोज कोकाटे व कॉंग्रेसचे विनायक देशमुख यांनी केली. यासंदर्भात बोलताना आपण कुठल्याही पक्षापेक्षा जनतेला महत्त्व देतो, असे सुजय म्हणाले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSujay Vikheसुजय विखेPathardiपाथर्डीcongressकाँग्रेस