शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

श्रीरामपूरने दिली कॉंग्रेसलाच साथ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 4:54 PM

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे लहू कानडे यांच्या विजयामुळे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे व माजी आमदार भानुदास मुरकुटे या साखर कारखानदारांना मोठा धक्का बसला आहे. शिवसेना व भारतीय जनता पक्षाची पारंपरिक मतेही फुटली. या विजयामुळे उपनगराध्यक्ष करण ससाणे यांना राजकीय उभारी मिळणार आहे. पक्षबदलामुळे भाऊसाहेब वाकचौरे यांची जी अवस्था केली तीच अवस्था मतदारांनी कांबळे यांची केली.

श्रीरामपूर विधानसभा निवडणूक विश्लेषण - शिवाजी पवार । श्रीरामपूर : श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे लहू कानडे यांच्या विजयामुळे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे व माजी आमदार भानुदास मुरकुटे या साखर कारखानदारांना मोठा धक्का बसला आहे. शिवसेना व भारतीय जनता पक्षाची पारंपरिक मतेही फुटली. या विजयामुळे उपनगराध्यक्ष करण ससाणे यांना राजकीय उभारी मिळणार आहे. पक्षबदलामुळे भाऊसाहेब वाकचौरे यांची जी अवस्था केली तीच अवस्था मतदारांनी कांबळे यांची केली. सलग पाच वेळा येथे काँग्रेसने गड राखत वर्चस्व सिद्ध केले. श्रीरामपुरात आजवर काँग्रेस पक्षाने १९ हजार मतांनी मिळविलेला हा सर्वात मोठा विजय ठरला. विशेष म्हणजे दिवंगत जयंत ससाणे यांनाही एवढे मताधिक्य मिळविता आले नव्हते. एमआयएम, वंचित आघाडी तसेच अपक्ष उमेदवार रामचंद्र जाधव हे काँग्रेसची मते खाण्यात निष्प्रभ ठरले.श्रीरामपुरचा निकाल अनेक अंगांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे. मंत्री राधाकृष्ण विखे व भानुदास मुरकुटे यांची येथे युती झाली. सोबतीला शिवसेना, भारतीय जनता पक्ष, सभापती दीपक पटारे, जिल्हा परिषद सदस्य शरद नवले अशी प्रस्थापितांची यंत्रणा कांबळेंच्या पाठीशी उभी राहिली. याउलट काँग्रेसचा किल्ला करण ससाणे गटाने लढविला. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांनीही अखेरच्या टप्प्यात जोरदार प्रचार राबविला. प्रारंभी एकतर्फी वाटणारी ही निवडणूक अखेरच्या टप्प्यात चुरशीची बनली. कांबळे यांचा प्रशासनावर कुठलाही वचक नाही, असा आरोपही केला गेला. तो कांबळे यांना अखेरपर्यंत खोडून काढता आला नाही. खासदार सदाशिव लोखंडे प्रचारात फारसे सक्रीय नव्हते. अनेक शिवसैनिकही प्रचारात नव्हते. विखे-थोरात संघर्षाची किनारश्रीरामपूर तालुका दत्तक घेऊन येथील विकासाची बांधिलकी स्वीकारण्याची तयारी विखे यांनी जाहीरपणे बोलून दाखविली. त्याविरोधातही जनतेतून प्रतिक्रिया उमटली. निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात विखे यांचे येथील अतिक्रमण हाच मुद्दा पुढे रेटला गेला. याउलट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी श्रीरामपुरातील हस्तक्षेप टाळत करण ससाणे यांच्यावर विश्वास दाखविला़ थोरातांचा हा मुत्सदीपणा मतदारांना भावला तर विखेंचा हस्तक्षेप चांगलाच खटकला असल्याचेही दिसते़ विकासाच्या विचाराला हा विजय समर्पितजात्यंध शक्तीविरोधात सर्वांना सोबत घेऊन जाणा-या विचारांचा, सर्वधर्म समभाव मानणा-या विचारांचा हा विजय आहे. दिवंगत गोविंदराव आदिक, जयंतराव ससाणे यांनी केलेल्या विकासाच्या विचाराला हा विजय समर्पित करतो. निष्क्रियतेविरोधात जनतेने दिलेला हा कौल आहे. श्रीरामपूर मतदारसंघात विकासाचे चक्र अधिक गतिमान करणार आहे, असे आमदार लहू कानडे यांंनी सांगितले.     

टॅग्स :shrirampur-acश्रीरामपूरMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019