शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

श्रीगोंद्याच्या कोहळ्याने वाढविला आग्राच्या पेठा मिठाईचा स्वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2020 11:40 AM

श्रीगोंदा तालुक्यातील शेतक-यांनी सेंद्रिय पद्धतीने तयार केलेल्या कोहळ्याने आग्राच्या जगप्रसिद्ध पेठा मिठाईचा स्वाद वाढविला आहे. येथील कोहळ्याला तेथील दुकानदार पसंती देऊ लागले आहेत. जंगलेवाडी, लिंपणगावातील शेतकरी याचे उत्पादन घेत आहेत.

 बाळासाहेब काकडे । 

श्रीगोंदा : तालुक्यातील शेतक-यांनी सेंद्रिय पद्धतीने तयार केलेल्या कोहळ्याने आग्राच्या जगप्रसिद्ध पेठा मिठाईचा स्वाद वाढविला आहे. येथील कोहळ्याला तेथील दुकानदार पसंती देऊ लागले आहेत. जंगलेवाडी, लिंपणगावातील शेतकरी याचे उत्पादन घेत आहेत.

कोहळा मूळचा जपान, इंडोनेशियातील असून नंतर त्याचा प्रसार इतर प्रदेशात झाला. पंजाब, पश्चिम बंगाल, गुजरात आणि महाराष्ट्रातील काही भागात कोहळ्याची लागवड केली जाते. हे पीक चार महिन्यांमध्ये घेतले जाते. कृषीतज्ज्ञ राहुल पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली चिखलठाणवाडी येथील शेतकरी बापूराव आप्पासाहेब धांडे, अनिल रोडे, अनिल जंगले (जंगलेवाडी), नंदकुमार कोकाटे (लिंपणगाव) यांनीही सेंद्रिय पद्धतीने कोहळा फुलविला. येथील कोहळ्याचा गर पेठा मिठाई तयार करण्यासाठी वापरला जातो. त्यामुळे शेतक-यांना चांगला भावही मिळत आहे. 

मी रासायनिक पद्धतीने भाजीपाला पिकवित होतो. कृषीमित्र राहुल पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली सेंद्रिय पद्धतीने कोहळा व इतर भाजीपाला लागवड करत आहे. कमी खर्चात चांगले उत्पन्न मिळाले, असे चिखलठाणवाडीचे शेतकरी बापूराव धांडे यांनी सांगितले. एक कोहळा दोन ते तीन किलोपर्यंत भरतो. पंधरा रूपये किलोप्रमाणे भाव मिळतो. एकरी १० टन माल निघतो. चार महिन्यात दीड लाखापर्यंत उत्पन्न मिळते.

औषधी गुणधर्म...कोहळा हा शीत, लघु, स्निग्ध, मधूर, गुणात्मक, बुद्धीवर्धक, वात-पित्तशामक आहे. यामध्ये कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस, प्रथिने तंतुमय व पिष्टमय पदार्थ, ‘अ’ आणि ‘ब’ जीवनसत्त्व विपूल प्रमाणात असते. कोहळा सूप किंवा रस पिल्याने मेंदूचा थकवा जाऊन उत्साह वाढतो.-डॉ. अरुण रोडे, डॉ. अनिल घोडके, श्रीगोंदा.

मानवी आरोग्याच्या दृष्टीने सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला फळे, कांदा व इतर शेती करणे आवश्यक झाले आहे. तालुक्यातील शेतक-यांनी मोठ्या प्रमाणावर अशी शेती केल्यास कृषीमालाचा वेगळा ब्रॅण्ड तयार होऊ शकतो.-पद्मनाभ म्हस्के, तालुका कृषी अधिकारी, श्रीगोंदा. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदाFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र