शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

पक्षाच्या आमदारांनीच संपवली शिवसेना; 'त्या' नगरसेवकांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 12:23 PM

औटी यांनी सुरुवातीला काँग्रेसच्या माध्यमातून राजकारण केले. तेथे उमेदवारी न मिळाल्याने ते सेनेत आले व आमदार झाले. मात्र त्यांनी शिवसैनिकांना कधीच आपले मानले नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी कधीही कार्यक्रम घेतले नाहीत.

अहमदनगर : शिवसेनेच्या जोरावर विजय औटी हे आमदार झाले, विधानसभेचे उपाध्यक्ष झाले. मात्र, त्यांनी शिवसैनिकांना कधीच किंमत दिली नाही. सेनेची एकही शाखा त्यांनी उघडू दिली नाही. शिवसैनिकांऐवजी त्यांनी काँग्रेस व कम्युनिस्ट विचारसरणीच्या लोकांना जवळ केले. त्यामुळे त्यांची आता पक्षातून हकालपट्टी करा व शिवसेना वाचवा, अशा आशयाचे पत्र पारनेर नगरपंचायतीच्या त्या पाच नगरसेवकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे. 

पारनेरमधील डॉ. मुदस्सिर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी व नंदा देशमाने या पाच नगरसेवकांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र, उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांकडे नाराजी नोंदविताच हे नगरसेवक परत सेनेत आले. मातोश्रीवर या नगरसेवकांनी ठाकरे यांच्या उपस्थितीत पुन्हा सेनेत प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी ठाकरे यांना एक पत्र दिले असून त्यात पारनेरचे सेनेचे माजी आमदार औटी यांच्याबद्दल तक्रार केली आहे. 

 औटी यांनी सुरुवातीला काँग्रेसच्या माध्यमातून राजकारण केले. तेथे उमेदवारी न मिळाल्याने ते सेनेत आले व आमदार झाले. मात्र त्यांनी शिवसैनिकांना कधीच आपले मानले नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी कधीही कार्यक्रम घेतले नाहीत.

सेनाप्रमुखांच्या अस्थी तालुक्यात आल्या असता औटी साधे दर्शनाला आले नाहीत. आपण मुख्यमंत्री झाल्यावर अभिनंदनाचा साधा फलक लावला नाही. पक्षाचे संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख यांना औटी यांनी तालुक्यात येऊ दिले नाही. आलेच तर शिवसैनिकांशी संपर्क होऊ दिला नाही. त्यांचे सर्व राजकारण हे स्वार्थी होते. 

निलेश लंके हे सेनेत असताना पक्षसंघटन वाढवत होते. मात्र, त्यांनाही औटी यांनी त्रास दिला. लंके यांनी उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर दगडफेक केली असे खोटे चित्र रंगवत त्यांचे तालुकाप्रमुखपद व पक्षातून काढले. मात्र, औटी हेच पक्ष संपवत असून त्यांना शिवसेनेतून काढा अन्यथा तालुक्यात एकही शिवसैनिक राहणार नाही, असा धोका या नगरसेवकांनी पत्रात व्यक्त केला आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेरPoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे