शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

पाच दिवसांत सत्तर आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2018 10:41 AM

जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या उद्देशाने पोलिसांनी गेल्या पाच दिवसांत केलेल्या धडक कारवाईत विविध गुन्ह्यांतील ७० आरोपींना अटक केली आहे. पोलिसांच्या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये चांगलीच घबराट निर्माण झाली आहे. 

अहमदनगर : जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या उद्देशाने पोलिसांनी गेल्या पाच दिवसांत केलेल्या धडक कारवाईत विविध गुन्ह्यांतील ७० आरोपींना अटक केली आहे. पोलिसांच्या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये चांगलीच घबराट निर्माण झाली आहे. केडगाव व जामखेड हत्याकांडांनंतर गेल्या महिनाभरात जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. सर्वसामान्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत गुन्हेगारांवर वचक निर्माण होऊन नागरिकांना पोलिसांबाबत विश्वास निर्माण व्हावा, या उद्देशाने २९ एप्रिलपासून जिल्ह्यात आॅल आउट मोहीम राबविण्यात आली. यामध्ये ६६८ जणांना समन्स बजावण्यात आले़ २६९ जणांना नॉन बेलेबल वॉरंट बजावण्यात आले. दारूबंदी कायद्यातंर्गत १०७ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली़ आर्म अ‍ॅक्ट अंतर्गत ५ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली.रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार व नव्याने गुन्हेगारी क्षेत्रात आलेल्यांची पोलिसांनी यादी तयार केली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार असेल्या अशा सर्वच गुन्हेगारांचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. गावठी कट्टा विकणारे, संघटित गुन्हेगारी करणारे, वाळूतस्कर, दारूविक्री असे गुन्हेगार सध्या पोलिसांचे लक्ष्य आहेत. चार दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी राहुरी येथील वाळूतस्करांची टोळी जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केली. जिल्ह्यातील आणखी २० टोळ्यांवर हद्दपारीची कारवाई प्रस्तावित आहे.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी रात्री तपोवन रोडवरील भिस्तबाग महालाजवळ सापळा लावून एका तरुणाला गावठी कट्ट्यासह ताब्यात घेतले. स्वप्नील अशोक ढवण (वय ३२ रा़ ढवण वस्ती, नगर) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून कट्ट्यासह एक जिवंत काडतूस, एक टाटा सफारी असा एकूण ४ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक कैलास देशमाने, कॉन्स्टेबल मन्सूर सय्यद, संदीप घोडके, संदीप पवार, रवींद्र कर्डिले, दत्तात्रय अडबल, विजय ठोंबरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPoliceपोलिस