शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

सरपंच ते मुख्यमंत्री सर्व लोकनियुक्त असावेत - आण्णा हजारे 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 8:54 PM

'थेट जनतेतून सरपंच निवडला जावा हेच महत्त्वाचे आहे. '

राळेगण : गावचा सरपंच नव्हे तर राज्याचा मुखमंत्री सुद्धा जनतेने निवडून दिला पाहिजे, तीच खरी लोकशाही म्हणता येईल. खेड्यांचा विकास पक्ष आणि गटामुळेच खुंटला आहे. घटनेप्रमाणे समुदायाला निवडणूक लढवता येत नाही. ती व्यक्तीनेच लढवली पाहिजे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले. 

थेट जनतेतून सरपंच निवडला जावा हेच महत्त्वाचे आहे. जर तो निवडला जात नसेल तर यासंबंधाने राज्यभर आंदोलन उभे होणे गरजेचे आहे. लोकशाही लोकांची आहे. लोकांच्या लोकसहभागातूनच ती चालली पाहिजे, असेही ही अण्णा हजारे म्हणाले. राज्य शासनाने लोकनियुक्त सरपंच पद रद्द करण्याच्या हालचाली सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष अनिल गीते पाटील आणि  सरपंच पदाधिकाऱ्यांनी आज आण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथे भेट घेतली. त्याप्रसंगी आण्णा यांनी वरील संदेश दिला आण्णा हजारे यांनी सध्या मौनव्रत धारण केले आहे. त्यामुळे  कागदावर लिहून त्यांनी सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. 

याप्रसंगी अण्णांच्या चालू असलेले मौनास  सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र च्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला. तसेच राज्य शासनाने जनतेतून लोकनियुक्त सरपंच रद्द बाबत घेतलेला निर्णय राज्यातील सरपंचांना मान्य नसून याबाबत अण्णांचे  लक्ष  वेधले. राज्य शासनाच्या निर्णयाबाबत अण्णांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सरपंच पदापासून मुख्यमंत्रिपदापर्यंत सर्व पदाची निवड जनतेतून निवड व्हावी, राज्य शासनाने जनतेचा हा अधिकार हिसकावू घेऊ नये. खेड्यांचा विकास गटतट आणि पक्षीय  राजकारणामुळे थांबलेला आहे. राज्यातील सरपंच व जनतेने याबाबत तीव्र स्वरूपाचा विरोध करावा. राज्यातील सरपंचांनी तसे ठराव करावेत व राज्य शासनाला पाठवावेत, असे सांगितले. 

याचबरोबर, प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांनी सरपंच परिषदेच्या माध्यमातून या असणाऱ्या शासनाच्या निर्णयाला प्रचंड विरोध करणार असल्याचे सांगितले. राज्यातील जनतेने याबाबत सरपंच परिषदेला सहकार्य करावे असे आवाहन सुद्धा त्यांनी केले. यावेळी महिला प्रदेश उपाध्यक्ष अश्विनी थोरात, प्रदेश सदस्य नारायण वनवे, आबासाहेब सोनवणे ,अरुण ठाणगे, स्वाती नऱ्हे व सरपंच उपस्थित होते.

टॅग्स :anna hazareअण्णा हजारे