शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

नगरहून बांग्लादेशाकडे निघाली सद्भावना सायकल रॅली, तीन हजार किमीचे अंतर : अण्णा हजारेंच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2021 1:59 PM

अहमदनगर : दोन देश, पाच राज्य असा तीन हजार किलोमीटरचा प्रवास असणाऱ्या नगर-बांग्लादेश सद्भावना रॅलीच्या प्रवासाला शनिवारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला.

अहमदनगर : दोन देश, पाच राज्य असा तीन हजार किलोमीटरचा प्रवास असणाऱ्या नगर-बांग्लादेश सद्भावना रॅलीच्या प्रवासाला शनिवारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला.

नगर शहरातील भूईकोट किल्ला परिसरातून रॅलीला सुरूवात झाली. १०० सायकलस्वार या रॅलीत सहभागी झाले आहेत. भारताच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष व बांग्लादेश मुक्ती संग्रामाच्या सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधून स्नेहालय संस्थेच्या वतीने ागांधी जयंतीच्या निमित्ताने या सद्भावना रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी हजारे यांच्यासह ज्येष्ठ गांधीवादी नेते डाॅ. एस. एन. सुब्बाराव, पद्मश्री पोपटराव पवार, मेहेरबाबा ट्रस्टचे मेहेरनाथ कलचुरी आदी उपस्थित होते. अण्णा हजारे यांनी रॅलीला शुभेच्छा देताना तरूणांनी देशसेवेसाठी वाहून घेण्याची अपेक्षा व्यक्त केली. युवाशक्ती जागृत झाली तर देशाचे भवितव्य उज्जल ठरेल. जीवनात ध्येय ठरवल्याशिवाय उद्दिष्टापर्यंत जाता येत नाही. त्यामुळे तरूणांनी गावाची, समाजाची, देशाची सेवा करण्याचे ध्येय ठेवून काम करावे, असे ते म्हणाले.

पवार म्हणाले की, भारत जोडो अभियान या रॅलीतून अधिक सक्षम होईल. तरूणांनी, विशेषता महाविद्यालयीन मुलांनी यात घेतलेला सहभाग उल्लेखनीय आहे. सुब्बाराव यांनी भारतीय स्वातंत्र्यचळवळीचे दाखले देत बांग्लादेशाच्या स्वातंत्र्याचा आढावा घेतला. महात्मा गांधीजींनी अहिंसेच्या बळावर देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. जे मागील दोन हजार वर्षांत झाले नाही, ते गांधीजींनी अहिंसेतून करून दाखवले. त्यामुळे त्यांचा वसा, प्रेरणा तरूणांनी घेऊन देश व समाजमन जोडण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे ते म्हणाले. सुब्बाराव यांनी गायलेल्या क्रांतीगिताने रॅलीतील सायकलस्वारांना संदेश देण्यात आला. यात्रेत पेमराज सारडा महाविद्यालयाच्या एनसीसी, एनएसएसचे विद्यार्थी, तसेच हिवरेबाजारचे विद्यार्थी सहभागी झाले होते. स्नेहालयचे अध्यक्ष संजय गुगळे यांनी आभार मानले. ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.

---------------

या यात्रेत १०० सायकलस्वार नगरमधून सहभागी झाले. महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिसा, झारखंड, पश्चिम बंगाल व बांग्लादेशातून सुमारे ३ हजार किमीचा प्रवास ही रॅली करणार आहे. रस्त्यामध्येही काही स्वयंसेवी या रॅलीत सहभागी होणार आहेत. दोन देशांत, तसेच समाजासमाजात मैत्री आणि सद्वाव वाढविण्यासाठी ही यात्रा आहे.

----------------

फोटो - ०२सद्भावना रॅली

तीन हजार किलोमीटरचा प्रवास असणाऱ्या नगर-बांग्लादेश सद्भावना रॅलीच्या प्रवासाला शनिवारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, एस. एन. सुब्बाराव, पोपटराव पवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ झाला.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरanna hazareअण्णा हजारे