शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

परतीच्या पावसाने आमच्या लक्ष्मीची शेतातच झाली माती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2019 3:08 PM

राहाता तालुक्यात उभ्या व सोंगूण पडलेल्या बाजरी, सोयाबीन, मका, कपाशी पिकाला कोंब फुटल्याने या पिकांची अक्षरश: माती झाल्याने दिवाळीची लक्ष्मी घरी येण्याच्या अगोदरच शेतक-यांच्या घरात काळोख पसरला. ‘आमच्या लक्ष्मीची तर शेतातच माती झाली हाय..!’ अशी म्हणण्याची वेळ शेतक-यांवर आली आहे.

गणेश आहेर । लोणी : हातातोंडाशी आलेल्या शेतक-यांच्या पिकलेल्या मालावर सतत बारा दिवसांपासून परतीचा पाऊस घाला घालत आहे. त्यामुळे खरिपांची पिके नेस्तनाबूत झाले. राहाता तालुक्यात उभ्या व सोंगूण पडलेल्या बाजरी, सोयाबीन, मका, कपाशी पिकाला कोंब फुटल्याने या पिकांची अक्षरश: माती झाल्याने दिवाळीची लक्ष्मी घरी येण्याच्या अगोदरच शेतक-यांच्या घरात काळोख पसरला. ‘आमच्या लक्ष्मीची तर शेतातच माती झाली हाय..!’ अशी म्हणण्याची वेळ शेतक-यांवर आली आहे.  गेल्या दहा-बारा दिवसांपासून राहाता  तालुक्याला पावसाने झोडपून काढले आहे.  खरीप हंगामात सुरूवातीला पिकांसाठी हवाहवासा वाटणारा पाऊस मागील चार-पाच वर्षाच्या दुष्काळाची झीज नक्कीच भरून काढणार या आशेने शेतकºयांनी यंदा कोणतीही कसर न ठेवता उत्पादन खर्चाला मोकळी वाट करून दिली होती. परंतु पिके काढणीच्या वेळी हाच जास्तीचा पाऊस पिकांसाठी घातक ठरला. बाजरी, मका, सोयाबीन काढणीच्या वेळी हा पाऊस थांबलाच नाही. हाताशी आलेले पीक भिजल्याने  मातीमोल झाले. १८ आॅक्टोबरपासून आजतागायत राहाता तालुक्यातील शेतकरी संध्याकाळी तालुक्यात कुठे न कुठे  धो-धो पाऊस अनुभवत आहेत.आतापर्यंत अनेक वेळा पावसाळ्यात भरपूर पाऊस पडला असला तरी तो ठराविक अंतराने उघडिप देत राहिल्याने पिकांना नुकसानकारक ठरत नव्हता. दिवाळीला पण कधी कधी एक-दोन दिवसांचा होत असे. पण यावर्षी  परतीचा असा पहिल्यांदा पाऊस पाहिला, असे गोगलगाव येथील आप्पा चौधरी यांनी सांगितले. दिवाळीच्या सुट्टीला गेलेले कृषी अधिकारी, विमा कंपनीचे प्रतिनिधी नॉट रिचेबल आहेत. रिचेबल झाले तर फोन उचलायला तयार नाही. मंडल कृषी कार्यालयातील अधिकारी पंचनामे करण्याच्या नावाखाली कार्यालये दिवसभर बंद ठेवत आहेत. हा लोणीच्या मंडल कृषी कार्यालयातील माझा अनुभव आहे, असे गोगलगाव येथील शेतकरी काशिनाथ उगले यांनी सांगितले. सुरूवातीला झालेल्या पावसावर सोयाबीन, बाजरी पिके पेरली. पण त्यानंतर पाऊस गायब झाला अन सोयाबीन, बाजरीची पिके वाळली. सुकून गेल्याने त्यावरून नांगर फिरवला. चा-यासाठी मका पेरली गेली. शेंडा खाणाºया अळीपासून ती कशीबशी वाचविली पण आता परतीच्या पावसाने हातची गेली, असे शेतकरी पुंजा हरी मगर यांनी सांगितले.     

टॅग्स :rahaataराहाताRainपाऊस