शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
3
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
5
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
6
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
7
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
8
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
9
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
10
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
11
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
12
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
13
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
14
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
15
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
16
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
17
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
18
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
19
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
20
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'

निकृष्ट बाजरी बियाणाचा अहवाल रखडला; खडकवाडी, कामठवाडीच्या शेतक-यांना आर्थिक फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 1:10 PM

स्प्रिंहा कंपनीचे एस ३०१ बाजरी बियाणे निकृष्ट दर्जाचे निघाले. त्यामुळे कणसाला अत्यल्प दाणे भरल्याने पारनेर तालुक्यातील खडकवाडी, कामठवाडीमधील सुमारे ४० ते ४५ शेतक-यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. याबाबत कृषी अधिका-यांच्या चौकशी समितीचा अहवाल रखडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

विनोद गोळे ।  पारनेर : स्प्रिंहा कंपनीचे एस ३०१ बाजरी बियाणे निकृष्ट दर्जाचे निघाले. त्यामुळे कणसाला अत्यल्प दाणे भरल्याने पारनेर तालुक्यातील खडकवाडी, कामठवाडीमधील सुमारे ४० ते ४५ शेतक-यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. याबाबत कृषी अधिका-यांच्या चौकशी समितीचा अहवाल रखडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.पारनेर तालुक्यातील खडकवाडी, कामठवाडी येथील शेतक-यांनी स्प्रिंहा बायोस्कील कंपनीचे एस-३०१ बाजरी बियाणे घेऊन पेरणी केली होती. मात्र या बाजरीच्या कणसांमध्ये दाणे कमी प्रमाणात भरल्याचे शेतक-यांच्या लक्षात आले. शेतक-यांनी याबाबत भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे प्रमुख संतोष वाडेकर, प्रवक्ते राजेंद्र रोकडे यांच्याकडे ही माहिती दिली. वाडेकर, रोकडे यांनी कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांना सांगितल्यावर १५ आॅक्टोबर रोजी उपविभागीय कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ एन. एस. उगले, महाबीजचे पुरुषोत्तम फाटे, मंडल कृषी अधिकारी व्ही. एन. पवार, पंचायत समितीचे कृषी अधिकारी व्ही. एन. उघडे यांची चौकशी समितीने प्रत्यक्ष शेतक-यांच्या शेतात जाऊन बाजरी पिकाची व कणसाची पाहणी केली. त्यानंतर दोन दिवसात अहवाल येऊन बियाणे निकृष्ट असेल तर शेतक-यांना नुकसान भरपाई मिळेल, असे समितीने सांगितले होते.चौकशी समितीसमोर फिरवला पिकांवर रोटावेटरकामठवाडी, खडकवाडी परिसरातील शेतकºयांनी बाजरीच्या पिकावर रोटावेटर फिरवला. यावेळी शेतकºयांना आपले अश्रू अनावर झाले. पारनेर तालुक्यातील खडकवाडी, कामठवाडी परिसरातील शेतक-यांच्या त्या बाजरी पिकांचे नमुने घेतले आहेत. अहवाल आल्यानंतर निर्णयदोन दिवसात अहवाल येईल. चौकशी समितीचा अहवाल अद्याप आमच्याकडे आलेला नाही. आम्ही शेतक-यांसाठीच आहोत. अहवाल आल्यानंतर निर्णय होईल, असे कर्नाटक येथील कंपनीचे विभाग अधिकारी प्रसाद व उपविभागीय कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे यांनी सांगितले.    

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाAhmednagarअहमदनगर