शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

शेतक-यांपेक्षा सरकारला नाईट लाईफचीच चिंता अधिक- राधाकृष्ण विखे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2020 2:08 PM

मागील सरकारच्या योजना बंद करण्यावर सरकारचा भर आहे. शेतक-यांपेक्षा सरकारला नाईट लाईफचीच चिंता अधिक असल्याची खोचक टीका माजीमंत्री, आमदार राधाकृष्ण विखे यांनी केली.

शिर्डी : राज्यातील जनतेला दिलासा देण्यापेक्षा अडचणी वाढविण्याचाच सरकारचा प्रयत्न दिसतो. कोणत्याही आश्वासनाची पूर्तता नाही. तीन तिघाडी आणि काम बिघाडी, अशी सरकारची अवस्था झाली आहे. मागील सरकारच्या योजना बंद करण्यावर सरकारचा भर आहे. शेतक-यांपेक्षा सरकारला नाईट लाईफचीच चिंता अधिक असल्याची खोचक टीका माजीमंत्री, आमदार राधाकृष्ण विखे यांनी केली.लोणी येथे सोमवारी माजीमंत्री विखे पत्रकारांशी बोलत होते. सरकार नविन असल्याने त्यांना निर्णय घेण्यासाठी आमच्या शुभेच्छा कायम आहेत. पण मूळ विषयाला बगल देण्याचे काम सरकारने थांबविले पाहिजे. अतिवृष्टीचे २५ हजार रुपये शेतक-यांना देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते त्याचे काय झाले? सातबारा कोरा करण्याचा शब्दही हे सरकार विसरले आहे. केलेल्या घोषणांची अंमलबजावणी होत नसल्यानेच राज्यात पुन्हा शेतक-यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. घेतलेल्या निर्णयाच्या माध्यमातून सरकारने लोकांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे. पण या सरकारकडून जनतेची अडवणूकच सुरू आहे. मुख्यमंत्र्याचा रिमोट कोण चालवतय यापेक्षा राज्याचा विकास महत्वाचा असल्याचे विखे यांनी स्पष्ट केले.पाणी प्रश्नाकडे सरकारने गांभीर्याने पहावेमाजी मंत्री पंकजा मुंडे यांनी मराठवाड्यातील पाणी प्रश्नावर केलेल्या आंदोलनाबाबत विखे म्हणाले, मागील सरकारच्या योजना बंद करून या सरकारला पुढे जाता येणार नाही. गोदावरीचे खोरे हे तुटीचे खोरे म्हणून ओळखले जाते. या भागातील पाणी प्रश्नासाठी कायमच संघर्ष झाला. स्व.बाळासाहेब विखे पाटील यांनी याबाबत सातत्याने भूमिका मांडली, पण विखे पाटलांना पाणी प्रश्नाचे श्रेय मिळेल म्हणून जे विरोध करत होते तेच आता या प्रश्नावर एका सुरात बोलू लागले आहेत. गोदावरी खो-यातील पाण्याची तूट भरून काढली तर नगर, नासिकसह मराठवाड्याचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटेल. पाणी प्रश्नावरून प्रादेशिक वाद निर्माण करण्यापेक्षा सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून मागील सरकारने मराठवाडा वॉटर ग्रीड आणि पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरीच्या खो-यात वळविण्याच्या संदर्भात घेतलेल्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलGovernmentसरकारPoliticsराजकारण