शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

पॅसेंजर रेल्वे २६ डिसेंबरपर्यंत बंदच राहणार; प्रवाशांचे सणासुदीत हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2019 1:32 PM

नेहमीप्रमाणे रेल्वे प्रशासनाने दौंड-मनमाड दरम्यान धावणाºया शिर्डी फास्ट पॅसेंजरसह सहा पॅसेंजर गाड्या १६ जूनपासून २६ सप्टेंबर बंद केल्या होत्या. मात्र डेडलाईन संपली तरीही पॅसेंजर गाड्या चालू झाल्या नाहीत. रेल्वे प्रशासनाने पुन्हा आदेश काढून २६ डिसेंबरपर्यंत तीन महिने या गाड्या बंद रहाणार असल्याचे जाहीर केले आहे. तशा प्रकारच्या सूचना विसापूरसह इतर रेल्वे स्थानकांच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आल्या आहेत. 

नानासाहेब जठार ।  विसापूर : नेहमीप्रमाणे रेल्वे प्रशासनाने दौंड-मनमाड दरम्यान धावणाºया शिर्डी फास्ट पॅसेंजरसह सहा पॅसेंजर गाड्या १६ जूनपासून २६ सप्टेंबर बंद केल्या होत्या. मात्र डेडलाईन संपली तरीही पॅसेंजर गाड्या चालू झाल्या नाहीत. रेल्वे प्रशासनाने पुन्हा आदेश काढून २६ डिसेंबरपर्यंत तीन महिने या गाड्या बंद रहाणार असल्याचे जाहीर केले आहे. तशा प्रकारच्या सूचना विसापूरसह इतर रेल्वे स्थानकांच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आल्या आहेत.  मागील दोन वर्षांत टप्प्याटप्प्याने सतत पॅसेंजर गाड्या बंद करण्यात येत आहेत. गेल्या तिने महिन्यांपासून मात्र शिर्डी-सीएसटी मुंबई फास्ट पॅसेंजरही बंद करण्यात आली आहे. या बंद गाड्यात साईनगर शिर्डी फास्ट पॅसेंजरला कात्री लावण्यात आल्याने साईभक्तांना त्रास सहन करावा लागणार आहे. रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानकांचे नोटीस बोर्डवर लावलेल्या आदेशानुसार दौंड-नांदेड, पुणे-निजामाबाद,मुंबई-शिर्डी डाउन व नांदेड-दौंड, निजामाबाद-पुणे, शिर्डी- मुंबई या अपगाड्या २६ डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. पॅसेंजर गाड्या म्हणजे गरीबांचा रथ समजला जातो. त्याच गाड्यांवर रेल्वेकडून रेल्वेलाईन दुरुस्ती करण्याच्या नावाखाली वारंवार बंदचे हत्यार चालवले जात आहे. सतत पॅसेंजर गाड्या बंद राहिल्याने सामान्य प्रवासी रेल्वे प्रवासापास्ूुन दुरावत चालला आहे. दौंड-मनमाड रेल्वे लाईनवर दिवसा एकही पॅसेंजर गाडी नसल्याने विसापूर, बेलवंडी, श्रीगोंदा, काष्टी, सारोळा, अकोळनेर यासारखी स्थानके ओस पडली आहेत. प्रवासीही पॅसेंजर गाड्या कधी सुरू होणार याची चौकशी करून वैतागले आहेत. दौड-मनमाड मार्गावरील सर्व रेल्वे स्थानके केवळ क्रॉसिंग स्टेशन बनली आहेत. ऐन सणासुदीत प्रवाशांचे हालमागील वर्षी दसरा व दीपावली या काळात इतर वेळी बंद असलेल्या पॅसेंजर गाड्या चालू केल्या होत्या. दीपावलीचे काळात अनेक चाकरमान्यांना सुट्ट्या असतात. बाहेर गावी रोजगारासाठी गेलेले लोक गावाकडे येऊन सण साजरा करतात. ऐन दीपावलीचे काळातही पॅसेंजर गाड्या बंद ठेवण्याचे रेल्वे प्रशासनानाचे धोरण अतिशय अयोग्य आहे. त्यामुळे प्रवाशांना समस्यांचा सामना करावा लागणार आहे. 

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीAhmednagarअहमदनगर