शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

राहुरीत मल्चींगवर सेंद्रीय टरबूज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 2:00 PM

भाजीपाला व फळांवर मोठ्या प्रमाणावर औषधांची फवारणी केल्याने ग्राहकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दुसऱ्या बाजूला सेंद्रीय शेती करण्याकडे शेतक-यांचा कल वाढू लागला आहे. हळूहळू सेंद्रीय भाजीपाला व फळांची मागणी ग्राहक करू लागले आहेत. त्यादृष्टिकोनातून ब्राम्हणी येथील शेतकरी वसंतराव ठुबे यांनी एक एकर क्षेत्रावर मल्चींग करून टरबुजाचे पीक घेतले आहे. सेंद्रीय टरबुजाला चांगली बाजारपेठही उपलब्ध झाली आहे.

ठळक मुद्देशेतकरी वसंतराव ठुबे यांची यशोगाथा

भाऊसाहेब येवलेराहुरी : भाजीपाला व फळांवर मोठ्या प्रमाणावर औषधांची फवारणी केल्याने ग्राहकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दुसऱ्या बाजूला सेंद्रीय शेती करण्याकडे शेतक-यांचा कल वाढू लागला आहे. हळूहळू सेंद्रीय भाजीपाला व फळांची मागणी ग्राहक करू लागले आहेत. त्यादृष्टिकोनातून ब्राम्हणी येथील शेतकरी वसंतराव ठुबे यांनी एक एकर क्षेत्रावर मल्चींग करून टरबुजाचे पीक घेतले आहे. सेंद्रीय टरबुजाला चांगली बाजारपेठही उपलब्ध झाली आहे.

वसंतराव ठुबे यांनी जमिनीची उभी, आडवी नांगरट केली़ चार ट्रॉली शेणखत टाकले़ निंबोळी खताच्या १० गोण्याचा वापर केला. सहा बाय सव्वा या आकारात टरबुजाची लावणी केली. त्यासाठी शुगर किंग या टरबुजाच्या वाणाची निवड केली. बेड तयार करून त्यावर ठिबकच्या नळया टकल्या़ त्यावर मल्चींग पसरविण्यात आले. टरबुजाची लागवड केल्यानंतर दही व गोमूत्र ठिबकव्दारे देण्यात आले. मल्चींगवर छिद्र पाडून टरबुजाबरोबरच मिरचीचीही लागवड केली. एकरी चोवीस टन टरबूज निघाले. आणखी दोन तोडे होणार आहे.शासनाने अहमदनगर येथे कृषी महोत्सवाचे आयोजन केले होते. कृषी महोत्सवात वसंतराव ठुबे यांनी टरबुजाचा स्टॉल लावला होता. सेंद्रीय टरबूज असल्याने ग्राहकांनी मोठ्या प्रमणावर टरबुजाला मागणी केली. ७० हजार रूपयांची विक्री कृषि महोत्सवात झाली. कृषि महोत्सवामुळे टरबुजाला चांगले मार्केट मिळाले.

राहुरी व ब्राम्हणी येथेही सेंद्रीय टरबुजाला चांगली मागणी होती. ग्राहक खुश झाले व चांगल्या प्रकारे वसंतराव ठुबे यांना अर्थप्राप्ती झाली. ठिबक व मल्चींगचा वापर केल्याने पाण्याची बचत झाली़ गवत कमी प्रमाणावर आले. रोगाचा प्रादुर्भावही कमी झाला, याशिवाय टरबुजाचे दर्जेदार उत्पादनही घेता आले. विद्राव्य खते ठिबकच्या माध्यमातून देता आले. टरबुज पीक घेताना मिरचीचेही आंतरपीक घेण्यात आले. टरबुजाचे पीक संपण्याच्या मार्गावर असताना मिरचीचा तोडा सुरू झाला आहे. मिरचीला ५० रूपये किलो याप्रमाणे भाव मिळत आहे. टरबूज व मिरची पीक घेताना वसंतराव ठुबे यांना शिवकुमार कोहकडे व डी.पी.गिरी यांचे मार्गदर्शन लाभले.बहुपीक पध्दतीवसंतराव ठुबे हे शेतामध्ये एकाच पिकावर अवलंबून राहत नाही. टरबूज-मिरची पिकांबरोबरच त्यांनी कांदा बीज उत्पादन घेतले, ऊस, कांदा व गहू ही पिके घेतली.बहुपीक पध्दती अवलंबिल्यामुळे एखाद्या पिकाला कमी भाव मिळाल्यास त्याची कसर दुस-या पिकातून भरून निघते.शेतीमालाचे भाव कोसळत असताना ग्राहकांची गरज ओळखून विविध पीक घेण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे,असे ठुबे यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरFarmerशेतकरी