शहरं
Join us  
Trending Stories
1
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मॅसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
2
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
3
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
4
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
5
IPL 2024 LSG vs MI : लखनौने टॉस जिंकला! हार्दिकच्या पदरी निराशा; १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूला संधी
6
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
7
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
8
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
9
Yuzvendra Chahal wife Dhanashree Verma: युजवेंद्र चहलला टी२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियात संधी; आनंदाच्या भरात पत्नी धनश्रीने काय केलं पाहा...
10
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
11
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
12
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
13
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
14
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
15
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
16
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली
17
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव
18
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
19
शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार
20
रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण

मुळा धरण उरले केवळ पिण्यासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2019 2:10 PM

मुळा धरणाचे पाणी शेतीसाठी मिळत नसल्याची ओरड करीत मुळा डाव्या कालव्याखालील शेतकऱ्यांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला़

भाऊसाहेब येवलेराहुरी : मुळा धरणाचे पाणी शेतीसाठी मिळत नसल्याची ओरड करीत मुळा डाव्या कालव्याखालील शेतकऱ्यांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला़ खरं म्हटलं तर मुळा धरणाची उभारणी शेतीसाठीच झालेली आहे़ काळाच्या ओघात शेतीसाठी बांधलेले मुळा धरण पिण्यासाठी व उद्योगासाठी उरले़ शेतीच्या पाण्याची कपात होत असल्याची जाणीव उशिराने शेतकऱ्यांना झाली आहे़मुळा धरणाचा उजवा कालवा निघाला़ डावा कालवा निघावा म्हणून डॉ़ बाबूराव दादा तनपुरे, का़ ल़ पवार, केशवराव हारदे आदींचे प्रयत्न सर्वश्रुत आहेत़ बी़ जे़ खताळ यांचे योगदानही पाटबंधारे खात्याचे मंत्री असताना महत्वाचे ठरले़ डावा कालवा निघाला नसता तर राहुरीचा उत्तर भाग उजाड राहिला असता़ डाव कालवा सुरू झाला़ लाभक्षेत्र सुजलाम सुफलाम झाले़ दोन्ही कालव्याचे पाणी ब्लॉकने घेण्याऐवजी शेतकºयांनी ब्लॅकने घेतले़ तत्कालीन आमदार प्रसाद तनपुरे यांनी ७ नंबरचा फॉर्म भरावा म्हणून शेतकºयांना अनेकदा विनवणी केली़ मात्र शेतकºयांनी त्याकडे दुर्लक्षकेले़ कागदोपत्री शेतीसाठीमुळा धरणातील पाण्याला मागणी नव्हती़२००५ मध्ये समन्याय पाणी वाटप झाले़ मध्यरात्री २ वाजता तत्कालीन लोकप्रतिनिधींनी सह्या केल्या़ मुळा धरणाच्या पाण्यात जायकवाडी वाटेकरी ठरला़ खरे तर सह्या करणाºया जिल्ह्यातील आमदारांना शेतकºयांनी जाब विचारायला हवा होता़ मात्र तसे धाडस कुणीही केले नाही़ जायकवाडीला जाणाºया पाण्यालाच शेतकºयांचा विरोध आहे़ मुळाचे पाणी बीडसह अनेक शहरांना भविष्यकाळात जाणार आहे़ त्यामुळे मुळा धरण भविष्यात केवळ पिण्यासाठी उरणार आहे़ भविष्यात थेंबभरही पाणी शेतीसाठी न मिळाल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही़ त्यामुळे मुळाच्या दोन्ही कालव्याखालील क्षेत्र ओसाड पडण्याची भीती आहे़शेकडो वर्षात मुळा नदीच्या काठावरील शेती कधी नव्हे एवढी यंदा संकटात सापडली़ उसाचा पट्टा जिरायती होण्याच्या मार्गावर आहे़ बारामाही वाहणारी मुळा ओस पडली आहे़मुळा धरणाच्या पाण्यावरून भविष्यकाळात संघर्ष वाढण्याची भीती आहे़ त्यासाठी डाव्या कालव्याबरोबरच उजव्या कालव्याचे शेतकरीही संघर्षाच्या पावित्र्यात आहेत़ आगामी विधानसभा निवडणुकीतही पाण्याचा प्रश्न ऐरणीवर येण्याची चिन्हे आहेत़तर हुलगे पेरण्याची वेळ येईलएकेकाळी नगर जिल्ह्याचे सरकारमध्ये वजन होते़ अलीकडील काळात मात्र जिल्ह्यातील नेत्यांची ताकद क्षीण झाली आहे़ जिल्ह्याचे पाणी बाहेर जात असताना पक्ष बाजूला ठेवून नेत्यांनी शासनावर दबाव आणण्याची गरज आहे़ अन्यथा उसाच्या पट्ट्यात हुलगे पेरण्याची वेळ शेतकºयांवर येण्याचे दिवस लांब नाहीत़ जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात धरणात पाण्याची आवक सुरू नाही़ पिण्यासाठी केवळ २२५ दलघफू पाणी शिल्लक आहे़ उसाचे क्षेत्र निम्म्याने घटले असून पाण्यासाठी एकीची गरज आहे़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर