शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

   नको नको मना गुंतू माया जाळी, काळ हा आला जवळी ग्रासावया 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2020 12:56 PM

हे मानवा या मायेत तू अडकू नको व देह तादात्म्य सोडून देवून जीवन मुक्तीचा मार्ग धर. म्हणजे तू सहज मुक्त होशील आणि अशा वेळी हे मानावा तू प्रेमाने गोविंदाचे भजन कर. म्हणजे मग तुला खरे समाधान मिळेल. 

                  यावत्पनो निवासति गेहे तावतपृच्छति कुशलं गेहे             गतवती वायौ देहापाये, भार्या बिभ्यति तस्मिन काये       भज गोविंदमभज गोविंदमभज गोविंदम मुढमते.... ॥ध्रु॥ ८ 

--------------------------------------(भज गोविन्दम-८) ....................................................

या श्लोकात जीवनातील वास्तव प्रतिपादन केले आहे. जोपर्य$ंत या देहात प्राण आहे, श्वास आहे, तोपर्यंतच तुमची घरातील लोक विचारपूस करतात. एकदा का तुमच्या शरीरातील प्राण, श्वास निघून गेला की मग या देहाला घरात कोणी ठेवीत नाहीत. लवकरात लवकर घराबाहेर काढतात व स्मशानात नेवून त्याचे दहन करतात. जीवनभर कितीही तुमच्यावर प्रेम केलेले असू द्या. प्रेतरूप शरीराला घरात ठेवीत नाहीत. इतकेच काय तर जी पत्नी आयुष्यभर तुमच्यार प्रेम करते ती सुद्धा त्या प्रेताला हात लावीत नाही. उलट ती घाबरते.  आणि समजा ठेवले तरी त्यामध्ये चैतन्य येत नाही. ते प्रेत जिवंत होत नाही.

हजारो वषापूर्वी इजिप्तमध्ये पिºयामिडमध्ये राजे लोकांचे देह ठेवण्याची प्रथा होती. त्याबरोबर दाग दागिने ठेवायचे. त्याच्या आवडत्या वस्तू ठेवायचे. पण आता संशोधन झाले आणि ते पिºयामीड खोदून बघितले तर त्या ममी म्हणजे जतन केलेले प्रेत तसेच होते. ते काही जिवंत झालेले दिसले नाही. तात्पर्य जोपर्यंत शरीरात प्राण आहे, तोपर्यंतच लोक या देहाला जपतात. नंतर कोणीही विचारीत नाही, हे वास्तव आहे. पण याचा कोणी विचार करीत नाही. एके ठिकाणी फार छान सांगितले आहे. 

ऐक चतुरा सोड फुगारा उत्तम नरदेही, भरला मायेचा बाजार जगामध्ये आपले कोणी नाही. 

या मायेच्या बाजारात आपले कोणी नाही. फक्त आपले आहेत, असे भासते. श्री संत ज्ञानोबाराय  म्हणतात, मातापिता बंधू बहिणी, कोणी न पवती निर्वाणी । इष्टमित्रस्वजनसखे हे तो सुखाची मांडणी।   एकला मी दु: ख भोगी कुंभपाक जाचणी । तेथे कोणी सोडविना एका सदगुरुवांचुनी॥ धर्म जागो सादैवाचा जे बा परोपकारीअंतकाळी कोणीही वाचवू शकत नाही. फक्त एक सद्गुरूच वाचवितात. म्हणजे ते काही जीवंत करीत नाहीत. पण मृत्यू सुकर करतात. या देहाचे मिथ्यत्व पटवून देतात. त्यामुळे देह सोडतांना सुद्धा दुख: होत नाही. उलट हा देह माझा नाही हे कळते. देह पंचमहाभूतांचा आहे. देह कोणाचाच या इहलोकात राहू शकत नाही.

श्री ज्ञानोबारायांनी मदालसा नावाच्या सुंदर प्रकरणातील अभंगात देहाचे मिथ्यात्व प्रतिपादन केले आहे. ते म्हणतात,

हा देहो नाशिवंत मळमुत्रांचा बांधा, वरी चर्म घातलें रे, कर्म कीटकांचा सांदा रवरव दुर्गंधी रे, अमंगळ तिचा बांधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. या देहाचा भंरवसा पुत्रा न धरावा ऐसा माझें माझें म्हणोनियां बहु दु:खाचा वळसा. बहुत ठकियेले मृगजळाच्या आशा, तृष्णा सांडूनियां योगी गेले वनवासा

मदालसाने आपल्या मुलांना पाळण्यातच हा उपदेश केला आणि विशेष म्हणजे तिचे पुत्र हा उपदेश ऐकून संन्यासी झाले. म्हणून देहाचे नश्वरत्व कळावे आणि आता तर सध्या कोरणाची साथ सुरु आहे. जगातील सर्व लोकांना कळून चुकले की, मानवी जीवन हे किती पराधीन आहे. पैसा, धन, द्रव्य काहीही उपयोगाला येत नाही. नव्हे जर कोरोना झालाय एव्हढे जरी कळाले तरी कोणीही जवळ येत नाही आणि कदाचित जर माणूस कोरनाने मेला तर त्याच्या प्रेताला सुद्धा हातही लावीत नाही. कुठलेही धार्मिक संस्कार सुद्धा होत नाहीत. लगेच उचलतात आणि स्मशानात नेवून चितेवर जाळून टाकतात. 

नको नको मना गुंतू माया जाळी, काळ हा आला जवळी ग्रासावया काळाची ही उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप सोडविना राजा देशीचा रे चौधरी, आणिक सोयरी भली भली तुका म्हणे तुला सोडविणा कुणी, एका चक्रपाणी वाचुनी 

म्हणून हे मानवा या मायेत तू अडकू नको व देह तादात्म्य सोडून देवून जीवन मुक्तीचा मार्ग धर. म्हणजे तू सहज मुक्त होशील आणि अशा वेळी हे मानावा तू प्रेमाने गोविंदाचे भजन कर. म्हणजे मग तुला खरे समाधान मिळेल. 

-भागावाताचार्य श्री अशोकानंद महाराज कर्डिले गुरुकुल भागवताश्रम ,चिचोंडी (पाटील) ता. नगर मोब. ९४२२२२०६०३ 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAdhyatmikआध्यात्मिक