शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

नगर, औरंगाबाद, नांदेडमध्ये ऊस गाळपाचा नवा उच्चांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2018 5:30 PM

१ नोव्हेंबरपासून सुरू झालेला महाराष्ट्रातील ऊस गळीत हंगाम संपण्याच्या मार्गावर आहे. १ एप्रिलपर्यंत राज्यातील ७८ कारखाने बंद झाले असून राज्याच्या साखर कारखानदारीची ऊस गाळप व साखर उत्पादनात नव्या उच्चांकाकडे वाटचाल सुरू आहे.

मिलिंदकुमार साळवेअहमदनगर : १ नोव्हेंबरपासून सुरू झालेला महाराष्ट्रातील ऊस गळीत हंगाम संपण्याच्या मार्गावर आहे. १ एप्रिलपर्यंत राज्यातील ७८ कारखाने बंद झाले असून राज्याच्या साखर कारखानदारीची ऊस गाळप व साखर उत्पादनात नव्या उच्चांकाकडे वाटचाल सुरू आहे. दरम्यान, अहमदनगर, औरंगाबाद, नांदेड, अमरावती या विभागांनी ३० मार्चअखेर गाळपाचा नवा उच्चांक नोंदविला आहे.

राज्याचा यंदाचा साखर हंगाम

राज्यात सन २०१४-१५ च्या हंगामात सर्वाधिक ९३०.४१ लाख मेट्रिक टन ऊस गाळप झाले होते. त्यातून १०५१.४३ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले होते. ९९ सहकारी व ७९ खासगी कारखान्यांचा या हंगामात समावेश होता. साखर आयुक्तालयाच्या ३० मार्चअखेरच्या आकडेवारीनुसार राज्यातील १०१ सहकारी व ८६ खासगी अशा १८७ साखर कारखान्यांमधून ९००.८१ लाख मेट्रिक टन ऊस गाळप झाले असून त्यातून १००४.५७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा ११.१५ टक्के एवढा आहे.

अहमदनगरने मोडला दशकातील विक्रम

साखर आयुक्तालयांतर्गत अहमदनगर व नाशिक जिल्ह्याचा समावेश असलेल्या अहमदनगर प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाच्या अखत्यारित १७ सहकारी व १० खासगी अशा २७ कारखान्यांनी गाळप सुरू केले होते. या कारखान्यांनी ३० मार्चअखेर १३२.११ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप १४२.७७ लाख क्विंटल साखर उत्पादन केले. अहमदनगर विभागाने १४-१५ चा १३० लाख मेट्रिक टन गाळपाचा गेल्या दहा वर्षांमधील उच्चांक मोडून यंदाच्या हंगामात गाळपाचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. अहमदनगर विभागात १४-१५ मध्ये १३० लाख मेट्रिक टन गाळप होऊन १४.३८ लाख मेट्रिक टन साखर उत्पादन झाले होते. १५-१६ मध्ये १०४.४३ लाख मेट्रिक टन ऊस गाळप होऊन ११.३८ लाख मेट्रिक टन साखर उत्पादन झाले होते.

मराठवाड्यातही विक्रमी गाळप

अहमदनगरसोबतच मराठवाड्यातील औरंगाबाद, नांदेड या दोन्ही विभागांसह विदर्भातील अमरावती विभागानेही गाळपाचा नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSugar factoryसाखर कारखाने